इंग्लंडसमोर विजयासाठी २८२ धावांचे आव्हान

महिला क्रिकेट वर्ल्डकपमधील इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत २८१ धावा केल्या.

Updated: Jun 24, 2017, 06:55 PM IST
इंग्लंडसमोर विजयासाठी २८२ धावांचे आव्हान title=

डर्बी : महिला क्रिकेट वर्ल्डकपमधील इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत २८१ धावा केल्या.

या सामन्यात इंग्लंडला विजय मिळवायचा असल्यास त्यांना २८२ धावांची आवश्यकता आहे. भारताच्या सलामीवीर पूनम राऊतने ८६ आणि स्मृती मंदनाने ९० धावा करताना दमदार सलामी दिली. 

कर्णधार मिताली राजनेही ७१ धावांची खेळी करताना संघाची धावसंख्या अडीचशे पार नेण्यात मदत केली.