Champions Trophy : टीम इंडियाने पाकिस्तानमध्ये जावं का? हरभजन सिंगने चोळलं जखमेवर मीठ, म्हणतो...

Harbhajan Singh on Pakistan Champions Trophy : टीम इंडिया आगामी चॅम्पियन ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका बीसीसीआयने मांडली आहे. याची आयसीसीने देखील याची दखल घेतलीये. 

| Jul 26, 2024, 16:21 PM IST
1/5

हरभजन सिंग

बीसीसीआयने घेतलेल्या भूमिकेवर आता टीम इंडियाचा माजी स्टार फिरकीपटू हरभजन सिंग याने आपलं मत व्यक्त केलं आहे. 

2/5

सुरक्षेचा मुद्दा

भारताने पाकिस्तामध्ये का जावं? कोणीतरी मला याचं उत्तर द्यावं. पाकिस्तानमध्ये खेळाडूंच्या सुरक्षेचा मोठा मुद्दा आहे, असं भज्जीने म्हटलं आहे.

3/5

पाकिस्तानवर टीका

कारण तुम्ही पाहाल तर पाकिस्तानमध्ये दररोज कोणती ना कोणती घटना होत राहते, अशी टीका हरभजन सिंगने पाकिस्तानवर केली आहे.

4/5

बीसीसीआयचा निर्णय योग्य

पाकिस्तानात जाणं मला तरी सुरक्षित वाटत नाही. बीसीसीआयने योग्य निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या भूमिकेचं मी समर्थन करतो, असंही हरभजन सिंगने म्हटलंय.

5/5

सेफ्टी म्हत्त्वाची

टीम इंडियाच्या खेळाडूंच्या सेफ्टीशिवाय कोणतीही गोष्ट मोठी नाही, अशी स्पष्ट भूमिका हरभजन सिंगने मांडली आहे.