कुणी डिवचलं तर उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही - विराट

भारतीय कॅप्टन विराट कोहलीनं ऑस्ट्रेलियावर २-१ नं मिळवलेला विजय हा आपल्या टीमचा आजवरचा सर्वश्रेष्ठ सीरिज विजय असल्याचं म्हटलंय. कुणी डिवचलं तर आम्ही त्याला चांगलचं प्रत्यूत्तर देण्यात तरबेज आहोत, असं भारतीय कॅप्टन विराट कोहलीनं म्हटलंय. 

Updated: Mar 28, 2017, 03:54 PM IST
कुणी डिवचलं तर उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही - विराट  title=

धर्मशाळा : भारतीय कॅप्टन विराट कोहलीनं ऑस्ट्रेलियावर २-१ नं मिळवलेला विजय हा आपल्या टीमचा आजवरचा सर्वश्रेष्ठ सीरिज विजय असल्याचं म्हटलंय. कुणी डिवचलं तर आम्ही त्याला चांगलचं प्रत्यूत्तर देण्यात तरबेज आहोत, असं भारतीय कॅप्टन विराट कोहलीनं म्हटलंय. 

चौथ्या टेस्टनंतर स्टार स्पोर्टसशी बोलताना, आमचं पारडं जड असो वा नसो.. जर कुणी डिवचण्याचा प्रयत्न केला तर त्याला योग्य उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. सगळ्यांनाच हे जमेल असं नाही... पण, आम्ही जशास तसं उत्तर देतो. 

ऑस्ट्रेलियन मीडियानं संपूर्ण सीरिज दरम्यान कोहलीला निशाण्यावर घेतलेलं दिसत होतं... पण, त्याकडे आम्ही फारसं लक्ष देत नसल्याचं कोहलीनं म्हटलंय. हा आमचा आजवरचा सर्वोत्तम विजय आहे... आम्ही ज्या पद्धतीनं विश्व रँकिंगमध्ये सातव्या क्रमांकाहून पहिल्या स्थानावर दाखल झालोत ते केवळ शानदार आहे... आणि कॅप्टन म्हणून मला याचा अभिमान आहे, असंही कोहलीनं म्हटलंय.