मॅच सुरू होण्यापूर्वीच भारतासोबत घडला अपशकुन!

सिडनीमध्ये सेमीफायनल खेळत असलेल्या टीम इंडियासोबत मॅच सुरू होण्यापूर्वीच अपशकुन घडला. ऑस्ट्रेलियाच्या सिडनी क्रिकेट ग्राऊंडमध्ये आज क्रिकेट वर्ल्डकपच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 'काँटे की टक्कर' सुरू आहे. 

Updated: Mar 26, 2015, 04:36 PM IST
मॅच सुरू होण्यापूर्वीच भारतासोबत घडला अपशकुन! title=

सिडनी: सिडनीमध्ये सेमीफायनल खेळत असलेल्या टीम इंडियासोबत मॅच सुरू होण्यापूर्वीच अपशकुन घडला. ऑस्ट्रेलियाच्या सिडनी क्रिकेट ग्राऊंडमध्ये आज क्रिकेट वर्ल्डकपच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 'काँटे की टक्कर' सुरू आहे. 

सकाळी मॅच सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. भारतीय टीमला टॉस हरून पहिले बॉलिंग करावी लागली. 

क्रिकेट तज्ज्ञांच्या मते या ग्राऊंडवर पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमला फायदा मिळतो आणि भारतातील अधिकाधिक माजी क्रिकेटपटूंनी टीम इंडियाला पहिले बॅटिंग करण्याचा सल्ला दिला होता. मात्र ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकल्यानंतर भारतीय टीमला मजबुरीमध्ये बॉलिंग करावी लागली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.