याच दिवशी कुंबळेने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात घेतले होते १० बळी

याच दिवशी १९९९मध्ये दिल्लीच्या मैदानात दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा क्रिकेटपटू अनिल कुंबळेने नवा विक्रम रचला होता. 

Updated: Feb 7, 2016, 12:08 PM IST
याच दिवशी कुंबळेने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात घेतले होते १० बळी title=

मुंबई : भारतात क्रिकेटला सर्व खेळांचा राजा म्हटले जाते. भारतात क्रिकेट चाहत्यांची जितकी संख्या आहे तितकी इतर कोणत्याही देशात नाही. त्यामुळे क्रिकेटमधील अनेक विक्रम चाहत्यांच्या आजही लक्षात आहेत. बातमीच्या खाली आहे व्हिडीओ

यातील एक विक्रम म्हणजे अनिल कुंबळेचा. याच दिवशी १९९९मध्ये दिल्लीच्या मैदानात दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा क्रिकेटपटू अनिल कुंबळेने नवा विक्रम रचला होता. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सर्व १० गडी बाद करत कुंबळेने नवा विक्रम प्रस्थापित केला होता. 

एकापाठोपाठ एक असे त्याने तब्बल १० विकेट घेतल्या आणि या कसोटी सामन्यात भारताचा विजय झाला होता.

पाहा व्हिडीओ