मुंबईकरांनीच मुंबईला हरवले...

आयपीएल २०१०च्या पहिल्या क्वॉलिफायरमध्ये रायजिंग पुणे सुपरजायंटने मुंबई इडियन्सचा धुव्वा उडवला. काल झालेल्या सामन्यात पुण्याने मुंबईला २० धावांनी हरवले. 

Updated: May 17, 2017, 04:01 PM IST
मुंबईकरांनीच मुंबईला हरवले... title=

मुंबई : आयपीएल २०१०च्या पहिल्या क्वॉलिफायरमध्ये रायजिंग पुणे सुपरजायंटने मुंबई इडियन्सचा धुव्वा उडवला. काल झालेल्या सामन्यात पुण्याने मुंबईला २० धावांनी हरवले. 

मात्र या सामन्यात दोन मुंबईकर क्रिकेटपटूंनीच मुंबईला पराभवाचा धक्का दिला. अजिंक्य रहाणे आणि शार्दूल ठाकूर या दोन मुंबईकर क्रिकेटपटूंनी जबरदस्त कामगिरी करताना पुण्याच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. 

अजिंक्य रहाणेने जबरदस्त ५६ धावांची खेळी केली. तर दुसरीकडे शार्दूल ठाकूरने तीन विकेट घेत मुंबईच्या डावाला खिंडार पाडण्याचे काम केले. पुण्याने सुरुवातीला दोन विकेट झटपट गमावल्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी अजिंक्यने तिवारीबरोबर ८० धावांची भागीदारी केली.