पराभवाला मीच जबाबदार - महेंद्रसिंग धोनी

इंग्लड विरुद्धच्या एकमेव टी-२० सामन्या अवघ्या तीन रन्सने पराभवाची जबाबदारी टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने स्वीकारली आहे. भारत आणि इंग्लड यांच्या दरम्यान एकमेव टी-२० सामना खेळविण्यात आला. 

Updated: Sep 8, 2014, 07:27 PM IST
पराभवाला मीच जबाबदार - महेंद्रसिंग धोनी title=

बर्मिंघम : इंग्लड विरुद्धच्या एकमेव टी-२० सामन्या अवघ्या तीन रन्सने पराभवाची जबाबदारी टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने स्वीकारली आहे. भारत आणि इंग्लड यांच्या दरम्यान एकमेव टी-२० सामना खेळविण्यात आला. 
भारतासमोर इंग्लडने 181 रनचे आव्हान ठेवले होते. विराट कोहलीने इंग्लंड दौ-यात पहिले अर्धशतक केल्यानंतरही केवळ पाच विकेट गमावून 177 रन बनविण्यात यश आले. धोनीने सांगितले की, सहा बॉलमध्ये 17 रन बनविणे नेहमी कठीण काम असते. मी पहिल्या बॉलवर चौका लगावला. शेवटीच्या ओवरमध्ये मी कमीत कमी दोन असे शॉट गमावले की ज्यावर सहज बाउंड्री करू  शकलो असतो.  हे कठीण काम होते आणि काही वाईट दिवसापैकी हा एक दिवस होता. ज्यामुळे काही गोष्टी आपल्या बाजूने होऊ शकत नाही.

दुसरीकडे अंबाती  रायडू होता. पण भारतीय कर्णधारने स्वतः जवाबदारी घेण्याचा निर्णय घेऊन सुद्ध एक ही रन घेत आला नाही, असे त्याने सांगितले. धोनीला वाटत होते की, त्याच्या बॅटच्यामध्ये बॉल येईल. म्हणून त्याने जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला होता, पण असे झाले नाही. रायडू हा तेव्हाच आला होता. पण जी फलंदाजी त्याने केली होती. त्यात बॅटमध्ये शॉट त्याला खेळता आला नाही. त्यामुळे धोनीने विचार केला की, आता त्यांनी जबाबदारी घेण्याची वेळ आली आहे. धोनीने सांगितले की त्याने सुरूवातीलाच ठरविले होते की, ही मॅच तो फिनिश करणाऱ्याचा प्रयत्न करणार. अशा वेळी स्वतःचा आत्मविश्वास वाढविणे देखील महत्वपूर्ण काम असते. रायडूने सुद्धा असे करून शकला असता. पण यासाठी धोनीने जबाबदारी स्वीकारत आहे.

भारतीय गोलंदाजांना पुन्हा डेथ ओवर मधील रनवर अंकुश लावण्यात यश आले नाही. त्यांनी यार्कर करण्याऐवजी फुलटास गोलंदाजी केली. ही चिंतेचा विषय असल्याचे धोनीने कबूल केले. यार्कर अजून ही चिंतेचाबाब असल्यामुळे प्रारूपमधील अंतरनंतर हे खूप कठीण झाले आहे. आज आपल्याकडे तीन स्पिनर असल्यामुळे बॉलला जास्त घासता आले नसल्यामुळे डेथ ओवरमध्ये गोलंदाजी करणे खूप कठीण काम बनले. पण आपण जेव्हा व्यवस्थित यार्कर नाही करून शकत तेव्हा फलंदाज चकवा देतात येऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला तुम्हची लाइन आणि लेंथ बदलने गरजेचे असते. पण गोलंदाजानी आज काही सुधार नाही केल्या.

भारताने टेस्ट सिरिज 1-3 ने गमावली. पण वनडे सिरिज 3-1ने जिंकण्यात यश आले. या दोन महिन्याच्या दौ-याबदल सांगताना धोनीने सांगितले की, या दौ-यात आमच्या सोबत अनेक नवीन खेळाडू होते. ही पाच टेस्ट मैच सिरिज तशी खूप कठीण होती. या आधी भारतीय टीममधल्या एकाही व्यक्तीने पाच टेस्ट मैची सिरिज खेळली नव्हती. पहिल्या दोन मैचमध्ये आम्ही खूप चांगले प्रदर्शन केले होते. पण शेवटच्या तीन मैचमध्ये आम्ही चांगले प्रदर्शन करून शकलो नाही. यानंतर वनडेमध्ये चांगले प्रदर्शन करणे हे महत्त्वपूर्ण होते आणि आम्ही ते करून दाखविले.

 या दौ-याच्या 20-25 दिवसामध्ये आम्ही चांगले क्रिकेट नाही खेळू शकलो. असे प्रत्येक टीम सोबत होत असते. पण या अनुभवमधून शिकणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. यानंतर वेस्टइंडीज आणि ऑस्टे्लियासोबत खेळताना इंग्लंडमध्ये आलेला अनुभव कामी आल्यावर मला खूप आनंद होईल. असे धोनीने सांगितले.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.