वर्ल्डकपमध्ये सलग सहाव्या वेळेस भारताने पाकला लोळवलं

सलग सहाव्या वेळेस  भारताने पाकिस्तानचा वर्ल्डकपमध्ये पराभव केला आहे. भारताने पाकिस्तानसमोर ३०१ धावांचं आव्हान ठेवलं होतं, मात्र पाकिस्तान संघ २२४ धावांवर भुईसपाट झाला. भारताचा पाकिस्तानवर या सामन्यात ७६ धावांनी विजय झाला.

Updated: Feb 15, 2015, 06:33 PM IST
वर्ल्डकपमध्ये सलग सहाव्या वेळेस भारताने पाकला लोळवलं title=

अॅडलेड : सलग सहाव्या वेळेस  भारताने पाकिस्तानचा वर्ल्डकपमध्ये पराभव केला आहे. भारताने पाकिस्तानसमोर ३०१ धावांचं आव्हान ठेवलं होतं, मात्र पाकिस्तान संघ २२४ धावांवर भुईसपाट झाला. भारताचा पाकिस्तानवर या सामन्यात ७६ धावांनी विजय झाला.

शेवटचा वर्ल्डकप खेळणार पाकिस्तानचा क्रिकेटर बुम बुम आफ्रिदी, हा काहीतरी करेल असं सर्वांना वाटत होतं, पण आफ्रिदीही पिचवर टिकू शकला नाही.

भारतीय गोलंदाजीचा मारा पाकिस्तान टीम सहन करू शकली नाही, मिसबाह शिवाय कुणीही पिचवर जास्त काळ टिकू शकला नाही. वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानला हरवल्याने टीम इंडियाचं सर्व स्तरातून कौतुक होतंय.

भारतीय टीमचा हा शानदार विजय आहे, अजून आणखी पुढे जायचंय, अशी प्रतिक्रिया सचिन तेंडुलकरने ट्ववीटरवर दिली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.