भारताने सामना गमावला, पण धोनीने प्रेक्षकांची मने जिंकली

 भारत अ आणि इंग्लड दरम्यान मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडिअमवर झालेल्या पहिल्या सराव सामन्यात इंग्लडने भारतावर तीन गडी राखून विजय मिळविला. पण भारताने सामना गमावला असला तरी धोनी आणि युवीच्या फलंदाजीने प्रेक्षकांची मने जिंकली. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 10, 2017, 10:45 PM IST
भारताने सामना गमावला, पण धोनीने प्रेक्षकांची मने जिंकली  title=

मुंबई :  भारत अ आणि इंग्लड दरम्यान मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडिअमवर झालेल्या पहिल्या सराव सामन्यात इंग्लडने भारतावर तीन गडी राखून विजय मिळविला. पण भारताने सामना गमावला असला तरी धोनी आणि युवीच्या फलंदाजीने प्रेक्षकांची मने जिंकली. 

भारताने प्रथम फलंदाजी करत इंग्लड समोर ३०४ धावा केल्या. भारताने दिलेल्या आव्हानाला इंग्लडने सात गड्यांच्या मोबदल्यात पार केले.  इंग्लड करून बिलींग याने ९२ धावा काढल्या. 

दरम्यान, भारताच्या पहिल्या डावात  मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर बिनधास्त धोनी पुन्हा अवतरला आणि मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत त्याने ४० चेंडूत ६८  धावा काढत इंग्लंड संघाची अक्षरशः पिसे काढली. रायडूचे शतक आणि  धोनीच्या ६८ धावांच्या जोरावर भारताने ४ बाद ३०४ धावा काढल्या. 

भारताने प्रथम फलंदाजी करताना भारताची पहिली विकेट मनदिपच्या रुपात २५ धावांवर गेली त्यानंतर रायडू आणि शिखर धवन यांनी शानदार खेळी करत ११० धावांची भागिदारी केली. 

भारताकडून सर्वाधिक रायडूने ९७ चेंडूत १०० धावा केल्या. त्यानंतर तो रिटायर हर्ट झाला. त्यानंतर धोनीने ४० चेंडूत ६८ धावा, शिखर धवनने ८४ चेंडूत ६३ धावा आणि युवराज सिंग याने ४८ चेंडूत ५६ धावा केल्या. 

इंग्लंडकडून विली आणि बॅल याने प्रत्येकी दोन  विकेट घेतल्या.