अनुष्का-विराटचं 'हाथों मे हाथ लिए... चल दो ना साथ मेरे!'

वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये पराभव पत्करल्यानंतर सोशल मीडियावर क्रिकेटफॅन्सच्या रागाची शिकार ठरलेला क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री अनुष्का शर्मा आज मुंबईत दाखल झाले. 

Updated: Mar 28, 2015, 09:05 PM IST


हाथों मे हाथ लिए... 

मुंबई : वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये पराभव पत्करल्यानंतर सोशल मीडियावर क्रिकेटफॅन्सच्या रागाची शिकार ठरलेला क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री अनुष्का शर्मा आज मुंबईत दाखल झाले. 

महत्त्वाचं म्हणजे, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या तमाम मीडियासमोर कोहली आणि अनुष्का एकमेकांचे हात हातात घेऊन बाहेर पडले. 

कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनल मॅच खेळताना केवळ एक रन बनवून आऊट झाला होता. त्यामुळे, काही प्रेक्षकांनी सोशल मीडियावर ही मॅच पाहण्यासाठी सिडनी मैदानात पोहचलेल्या अनुष्काला 'राष्ट्रीय पनौती' ठरवून टाकलं होतं. 

दरम्यान, टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीही आज दिल्लीत दाखल झाला. तर टीम निर्देशक रवी शास्त्री आणि रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे खेळाडूही मुंबईत दाखल झाले. 

सूत्रांच्या माहितीनुसार, उरलेले इतर लोकही आज रात्री भारतात परततील. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.