आशिया कप टी -२० : भारताने बांगलादेशला ४५ धावांनी केले पराभूत

 एशिया कपच्या पहिल्या सामन्यात बुधवारी भारताने शानदार विजय मिळविला आहे. भारताने ४५ धावांनी बांगलादेशचा पराभव केला आहे. 

Updated: Feb 25, 2016, 04:28 PM IST
आशिया कप टी -२० : भारताने बांगलादेशला ४५ धावांनी केले पराभूत  title=

मीरपूर :  एशिया कपच्या पहिल्या सामन्यात बुधवारी भारताने शानदार विजय मिळविला आहे. भारताने ४५ धावांनी बांगलादेशचा पराभव केला आहे. 

पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम इंडियाने १६७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यात भारताकडून रोहित शर्माने ५५ चेंडूत सात चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ८३ धावा कुटल्या. त्याला हार्दिक पांड्याने १८ चेंडूत ३१ धावांची जबरदस्त साथ दिली. 

आशीष नेहरा याने ३ विकेट घेऊन बांगलादेशचा डाव खिळखिळा केला. कर्णधार महेंद्र सिंग धोनीने इनिंगच्या शेवटच्या चेंडूवर षटकार लगावला होता. 

बांगलादेशकडून अल अमीन हुसैन याने ३७ धावा देऊन ३ विकेट घेतल्या.