राज ठाकरेंचा परप्रांतीय फेरीवाल्यांना सज्जड दम

परप्रांतीय फेरीवाले जर आझाद मैदानावर आपली ताकद दाखविणार असतील तर दुसऱ्या दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना फूटपाथवर आपली ताकद दाखवेल

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 15, 2013, 07:54 PM IST

www.24taas.com, मुंबई
महाराष्ट्रातील शहरांवर पहिला अधिकार हा मराठी माणसाचा आहे. परप्रांतीय फेरीवाले जर आझाद मैदानावर आपली ताकद दाखविणार असतील तर दुसऱ्या दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना फूटपाथवर आपली ताकद दाखवेल, असा सज्ज दम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिदेत दिला.
राज ठाकरे यांनी गेल्या चार महिन्यांपासून कोणतेही वक्तव्य केले नव्हते. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेवर सर्वांचे लक्ष लागून होते. यावेळी त्यांनी ढोबळेंच्या बदलीचा मुद्दा पुढे करून परप्रांतीय फेरीवाल्यांवर हल्ला बोल केला. ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून पोलिसांचे मनोधैर्य खच्चीकरणाचे प्रकार सुरू आहे. कोणत्याही फेरीवाल्यावर कारवाई केली तर बदली होते, मग कोणता पोलिस अधिकारी फेरीवाल्यावर कारवाई करेल, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
यावेळी त्यांनी अजित पवार यांच्याही चांगलाच समाचार घेतला. ढोबळे यांची बदली आम्हांला मान्य नाही पण हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकारात घेतला आहे. सिंचनाची श्वेतपत्रिकाही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकाराने काढण्याचे आदेश दिले होते. तेव्हा का विरोध केला. तेव्हा का मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचा आदर केला नाही. आता या बाबतीत कुठलं राजकारण खेळलं जातयं, असा सवालही राज ठाकरे यांनी केला.
फेरीवाल्यांनी मोर्चा काढून ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला तर ते खपवून घेणार नाही. पोलिसांविरोधात, महापालिकेविरोधा मोर्चो काढून दाखवाच, त्याच दिवसापासून मनसे फुटपाथवर काय करते ते पाहा, मतांचा टक्का वाढविण्यासाठी सर्व राजकारण सुरू असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला. मराठी फेरीवाल्यांच्या जागा अमराठी फेरीवाले बळकावत आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक शहरावर पहिला अधिकार हा मराठी माणसाचा आहे. त्यामुळे मराठी फेरीवाल्यांना माझा विरोध नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक शहराच्या दोन टक्के हा फेरीवाल्यांसाठी ठेवायला हवा, यासाठी राष्ट्रपतींकडे प्रस्ताव गेला आहे. हा प्रस्ताव कशाला? काय चालंलय नक्की. मुंबईची लोकसंख्या १ कोटीच्या वर कधीच गेली आहे. त्यात दोन टक्के फेरीवाले मग रस्त्यावरील फुटपाथ या फेरीवाल्यांनीच भरणार? माणसांनी चालायचं कुठे... असे म्हणत राज ठाकरेंनी तोफ डागली.

राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे
- केंद्रातील सरकार आणि भाजपचा चर्चेचा खेळ सुरू आहे. समझोता एक्सप्रेस कोणी सुरू केली – राज
- सीमेवर पाकचा धिंगाणा चालला असताना क्रिकेट सामने आणि अमन की आशा हे कार्यक्रम कशासाठी ? – राज
- जे जवान शहीत होत आहेत, त्यांच्यासाठी भविष्यात काय सरकार करते – राज
- सीमेवरील जवानांचा खेळ चाललाय. दोन दिवस सहानभुती दाखवायची, हेच सरकारचे धोरण आहे – राज
- यापुढे काही घडले तर पाकिस्तानला उत्तर देऊ असे सांगणारे सिंग आधी घडलंय त्याकडे बघा -राज ठाकरे
- लष्करप्रमुख विक्रम सिंग यांच्यावर राज ठाकरे यांनी घेतले तोंडसुख
- भारत-पाक मुद्द्याचे राजकारण केलं जात आहे. दुसऱ्या विषयाकडे लक्ष वळविले जात आहे - राज ठाकरे
- बांग्लादेशी लोक झोपड्यात राहत आहेत. त्यांच्या झोपड्या जाळून त्यांना पक्की घरे दिली जातात –राज
- अनधिकृत रिक्षा-टॅक्सींवर कारवाई होत नाही, सरकार निष्काळजी आहे - राज ठाकरे
- मुंबईत अनधिकृत रिक्षा-टॅक्सी फिरत आहेत – राज
- फेरीवाल्यांबाबत राष्ट्रपतींकडे प्रस्ताव कशाला? काय चालंलय नक्की - राज ठाकरे
- राज्यातील शहरांवर मराठी माणसांचा पहिला हक्क – राज
- ढोबळेंवर कारवाई मात्र, परप्रांतीय फेरीवाल्यांवर कारवाई का नाही - राज ठाकरे
- माझ्या हातात सत्ता द्या, कायद्याचे राज्य कसे असते दाखवून देतो - राज ठाकरे
- परप्रांतीय फेरीवाल्यांना राज ठाकरे यांनी दिलाय दम
- मराठी फेरीवाल्यांच्या जागा अमराठी फेरीवाले बळकावत आहेत – राज
- फेरीवाल्यांनी मोर्चा काढला तर मनसे रस्त्यावर उतरेल, हे लक्षात ठेवा - राज ठाकरे
- मतांचा टक्का वाढविण्यासाठी सर्व राजकारण सुरू आहे – राज
- मोर्चा काढलात तर त्याच दिवसापासून मनसे फुटपाथवर काय करते ते पाहा - राज ठाकरे
- पोलिसांविरोधात, महापालिकेविरोधा मोर्चो काढून दाखवाच – राज
- फेरीवाल्यांनी मोर्चा काढून ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला तर ते खपवून घेणार नाही – राज
- राष्ट्रवादीची ढोंगबाजी सुरू आहे – राज
- गृहमंत्री राष्ट्रवादीचे असताना मुख्यमंत्री ढोबळेंची बदली करू शकतात? - राज ठाकरे