कोल्हापुरातील टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांचे राजीनामे

www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर कोल्हापुरातील टोल नाक्यावर काम करणाऱ्या आयआरबी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकरीचे राजीनामे दिले आहेत. यामुळे टोलवसुली विरोधातील आंदोलनाला कोल्हापुरात बळ मिळालं आहे. राजीनामे देऊन कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याचं सांगण्यात येत आहे. कोल्हापुरात सर्वात आधी टोलला विरोध झाला आहे. आयआरबी कंपनीने केलेल्या खर्चाचे पुर्नमूल्यांकन करण्याचे आदेशही सरकार देणार असल्याचं यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. कोल्हापुरातील जनतेने सर्वात जास्त कडाडून टोल वसुलीला विरोध केला आहे.

Updated: Feb 10, 2014, 01:31 PM IST