...तर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची - सेनेचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यांच्यात रंगलेला कलगीतुरा थांबायचं नाव घेत नाही आहे. 

Updated: Jun 26, 2016, 08:39 PM IST
...तर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची - सेनेचा इशारा title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यांच्यात रंगलेला कलगीतुरा थांबायचं नाव घेत नाही आहे. 

भाजपाचं पाक्षिक 'मनोगत'मध्ये उद्धव ठाकरेंची तुलना असराणीसोबत केल्याने शिवसैनिकांनी मनोगतच्या प्रति जाळल्या होत्या. त्याच सोबत भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांचाही पुतळा जाळण्यात आला होता. त्यावर आशिष शेलारांनी शिवसेनेला हा इशारा दिलाय.
 
भाजपचे लेख आणि नेत्यांचे पुतळे जाळणा-यांनी उद्या त्यांच्या वर्तमानपत्राच्या जाळपोळीसाठी तयार रहावे असा थेट इशाराच, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिलाय. तर असं काही घडल्यास, कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांची राहिल असा प्रति इशारा, शिवसेनेच्या मु्ंबईतल्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.