पाकिस्तानी कलाकारांनो 48 तासांत देश सोडा अन्यथा...

उरी येथील हल्ला आणि यूनोमध्ये पाकिस्ताननं भारतावर केलेल्या आरोपांनंतर मनसेनं पाकिस्तानी कलावंतांना धमकी दिलीये.. 

Updated: Sep 23, 2016, 02:48 PM IST
पाकिस्तानी कलाकारांनो 48 तासांत देश सोडा अन्यथा... title=

मुंबई :  उरीतल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मनसे आक्रमक झालीय. पाकिस्तानी कलाकारांना मनसेनं धमकी दिलीय.

48 तासांत पाकिस्तानी कलाकारांनी मायदेशी परत जावे अन्यथा जिथे असाल तिथे घुसून मारु असा इशारा मनसेनं दिलाय.

उरीतल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे 18 जवान शहीद झालेत. त्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात संतापाचं वातावरण आहे.

हे कमी की काय म्हणून पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्रसंघात काश्मीरचा राग आळवला. त्यामुळं पाकिस्तानविरोधात प्रचंड रोष निर्माण झालाय. आता याच पार्श्वभूमीवर मनसेनं पाकिस्तानी कलाकारांना देशात परत जाण्याचा इशारा दिलाय.