'शिवसेनेशी युतीची वेळ आली तर...'

राज्यातल्या 10 महापालिका आणि 11 जिल्हापरिषदांच्या निवडणूकीसाठी होणाऱ्या मतदानाला अवघे काही तास उरलेले आहेत.

Updated: Feb 20, 2017, 06:46 PM IST
'शिवसेनेशी युतीची वेळ आली तर...' title=

मुंबई : राज्यातल्या 10 महापालिका आणि 11 जिल्हापरिषदांच्या निवडणूकीसाठी होणाऱ्या मतदानाला अवघे काही तास उरलेले आहेत. अशावेळी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकालानंतर मंत्रिमंडळात बदलाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. आज झी 24 तासचे मुख्य संपादक डॉ उदय निरगुडकर यांना दिलेल्या रोखठोक मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी आपलं मत दिलखुलासपणे व्यक्त केलं.

पक्ष संघटना मजबूत आहे पण मंत्रिमंडळात फेरबदल होऊ शकतात असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. निवडणुकीनंतर भाजपच नंबर एकचा पक्ष ठरेल असा विश्वासही व्यक्त केला. त्याचप्रमाणे शिवसेनेशी वैर नाही पण युतीची वेळ आलीच तर पारदर्शकता हाच युतीचा पाया असेल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.