'स्वच्छ भारत अभियाना'चं काही भाजप आमदारांनाच वावडं- अनासपुरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाबाबत भाजपचेच काही आमदार उदासिन असल्याचं समोर आलंय. अभिनेता मकरंद अनासपूरे यानंच मुंबईतल्या एका सरकारी कार्यक्रमात याचा गौप्यस्फोट केलाय. 

Updated: Feb 5, 2015, 04:18 PM IST
'स्वच्छ भारत अभियाना'चं काही भाजप आमदारांनाच वावडं- अनासपुरे title=

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाबाबत भाजपचेच काही आमदार उदासिन असल्याचं समोर आलंय. अभिनेता मकरंद अनासपूरे यानंच मुंबईतल्या एका सरकारी कार्यक्रमात याचा गौप्यस्फोट केलाय. 

'परिवर्तनाच्या वाटेवर गोगलगाव' आणि 'करू भारत स्वच्छ भाऊ' या दोन माहितीपटांच्या डीव्हीडीचं अनावरण मकरंदच्या हस्ते झालं. अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यात असलेल्या गोगलगावनं केवळ एका महिन्यात लोकसहभागातून गावाचा कायापालट घडवला. याचं कौतूक करताना स्थानिक आमदारांनी मात्र यात रस दाखवला नसल्याची खंत मकरंदनं व्यक्त केलीये. 

विशेष म्हणजे राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अनेक मंत्री यांच्या उपस्थितीत मकरंदनं या उदासिनतेवर ताशेरे ओढले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.