सावधान! मुंबईत स्वाइन फ्ल्यूचे चार रुग्ण, राज्यात 22 जणांचा बळी

स्वाइन फ्लूनं मुंबईत शिरकाव केला असून फेब्रुवारी महिन्यात या तापाचे चार रुग्ण आढळले आहेत. कस्तुरबा रुग्णालयात तीन रुग्णांना दाखल करण्यात आलं आहे. यातील एकाची प्रकृती गंभीर तर दोघांची प्रकृती स्थिर आहे. तर चौथा रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचार घेतोय. राज्यात आतापर्यंत 22 रुग्णांचा स्वाइन फ्ल्यूमुळे मृत्यू झालाय. 

Updated: Feb 5, 2015, 10:28 AM IST
सावधान! मुंबईत स्वाइन फ्ल्यूचे चार रुग्ण, राज्यात 22 जणांचा बळी title=

मुंबई: स्वाइन फ्लूनं मुंबईत शिरकाव केला असून फेब्रुवारी महिन्यात या तापाचे चार रुग्ण आढळले आहेत. कस्तुरबा रुग्णालयात तीन रुग्णांना दाखल करण्यात आलं आहे. यातील एकाची प्रकृती गंभीर तर दोघांची प्रकृती स्थिर आहे. तर चौथा रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचार घेतोय. राज्यात आतापर्यंत 22 रुग्णांचा स्वाइन फ्ल्यूमुळे मृत्यू झालाय. 

सांताक्रूझ इथली नऊ वर्षीय मुलगी, वांद्रे इथल्या ५५ वर्षीय महिला, माहिममधील ५४ वर्षीय महिला आणि मुलुंड इथले ६५ वर्षीय पुरुष यांना स्वाइन फ्ल्यूची लागण झाली आहे. ६५ वर्षीय रुग्णाची प्रकृती गंभीर असल्यामुळं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. तीन रुग्णांना टॅमी फ्ल्यूच्या गोळ्या सुरू करण्यात आल्या आहेत. मंगळवारी पालघर इथल्या एका रुग्णाचा होली स्पिरीट रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती डॉ. गोमारे यांनी दिली.

मुंबईतील सर्व रुग्णालयात स्वाइन फ्ल्यू विषयी परिपत्रक पाठवण्यात आले आहेत. एखाद्या रुग्णात लक्षणं आढळल्यास त्वरित तपासणी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कस्तुरबा रुग्णालयात यासाठी एक वॉर्ड सज्ज आहे, असं डॉ. गोमारे यांनी सांगितलं. 

जसलोकमध्ये स्वाइन फ्ल्यूचे दोन रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी एक रायपूरचा तर दुसरा खारघरचा असल्याची माहिती डॉ. ओम श्रीवास्तव यांनी दिली. 

स्वाइन फ्ल्यूची लक्षणं: 

घसा दुखणं, घसा खवखवणं, डोके दुखी, ताप अशी लक्षणं आढळली तर त्वरित डॉक्टरचा सल्ला घ्या. ही स्वाईन फ्ल्यूची ही लक्षणं आहेत. लवकर उपचार घेतल्यास स्वाईन फ्ल्यू लवकर बरा होऊ शकतो, असं तज्ज्ञ डॉक्टरांचं म्हणणं आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.