राजू शेट्टी यांची आजपासून आत्मक्लेष यात्रा

शेतकरी नेते म्हणून आम्ही कमी पडलो त्यामुळे आता भाजपसोबत राहायचं की नाही याचा निर्णय आमची कार्यकारिणी घेईल असंही त्यांनी सांगितलं.

Updated: May 22, 2017, 09:23 AM IST
राजू शेट्टी यांची आजपासून आत्मक्लेष यात्रा title=

पुणे : शेतक-यांना कर्जमाफी मिळावी तसेच रंगनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात यासाठी आजपासून राजू शेट्टींची आत्मक्लेष यात्रा सुरु होणार आहे.. या यात्रेत ते पुणे ते मुंबई पायी प्रवास करणार आहेत.

 नऊ दिवसात हि यात्रा मुंबईत पोहचणार असून हजारो शेतकरी या यात्रेत सहभागी होणार आहेत. तर शेतक-यांना तीन वर्षात दिलेली आश्वासनं सरकारनं पुर्ण केली नाही. 

शेतकरी नेते म्हणून आम्ही कमी पडलो त्यामुळे आता भाजपसोबत राहायचं की नाही याचा निर्णय आमची कार्यकारिणी घेईल असंही त्यांनी सांगितलं.