काँग्रेसच्या पाचही आमदारांचं निलंबन कायम- निलंबन समिती

भाजप आणि शिवसेना सत्तेमध्ये सहभागी आल्यानंतर, आता विरोधकदेखील सरकारच्या विरोधात एकवटले आहेत....

Updated: Dec 9, 2014, 08:58 PM IST
 काँग्रेसच्या पाचही आमदारांचं निलंबन कायम- निलंबन समिती title=

संध्याकाळी 5.56 वा

- काँग्रेसच्या पाचही आमदारांचं निलंबन कायम

- विधानसभा अध्यक्ष आणि समिती बैठकीत निलंबन कायम ठेवण्याचा निर्णय

- राज्यपालांना धक्काबुक्की प्रकरणी झाले होते निलंबन, समिती राज्यपालांना भेटणार

दुपारी १.३० वा
- विधानसभेत सरकारी पक्षाकडून दुष्काळावर चर्चा सुरू
- तर चर्चा ही विरोधकांच्या स्थगन प्रस्थावावर सुरु व्हायला हवी होती, अशी विरोधकांनी मागणी केली
- चर्चेआधीच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आर्थिक पॅकेजची घोषणा करण्याची विरोधकांची मागणी

- विधानपरिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब
- विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधला गोंधळ कायम 

दुपारी : १.०० वा
- विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात
- विरोधकांचा गदारोळ आणि घोषणाबाजी सुरू

दुपारी १२.३० वा.
- विरोधकांच्या गोंधळामुळे विधानपरिषदेचं कामकाज १.०० वाजेपर्यंत तहकूब
- विधानसभेचंही कामकाज तहकूब... सकाळपासून विधानसभा तिसऱ्यांदा तहकूब

दुपारी १२.०० वा.
- विधानपरिषद कामकाज पुन्हा सुरू होताच काँग्रेस - राष्ट्रवादीचा गोंधळ सुरू 
- विधानसभेचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब 

सकाळी ११.३५ वा.
- वेलमध्ये घुसून विधानसभेतचं विरोधकांचं ठिय्या आंदोलन
- ठिय्या आंदोलनात बाळासाहेब विखे पाटील, बाळासाहेब थोरात, अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांचा सहभाग

सकाळी ११.३० वा.  
- विधानपरिषद कामकाज ३० मिनिटांकरता तहकूब
- दुष्काळ आणि आत्महत्या संदर्भात विरोधकांनी दिलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी फेटाळला

सकाळी ११.२५ वा.
दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्या संदर्भात विरोधकांनी स्थगन प्रस्ताव दिला आहे, त्यावर चर्चा व्हायला हवी... अजून किती काळ वाट पाहणार? - जयंती पाटील 
राज्यातील अनेक जिल्ह्यात दुष्काळ पडलाय... शेतकरी आत्महत्या करतायत... शेतकऱ्यांसाठी तत्काळ आर्थिक पॅकेजची घोषणा करा - छगन भुजबळ

सकाळी : ११.१५ वा.
विधानपरिषद कामकाज सुरू होताच काँग्रेस - राष्ट्रवादीची घोषणाबाजी पुन्हा सुरू 

नागपूर : हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. भाजप आणि शिवसेना सत्तेमध्ये सहभागी आल्यानंतर, आता विरोधकदेखील सरकारच्या विरोधात एकवटले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची नागपूरमध्ये बैठक झाली. राज्यातील दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नावरून सरकारला धारेवर धरण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे समजते. 

दरम्यान, सोमवारी म्हणजेच अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गुलाबी थंडीत नागपूरच राजकीय वातावरण मात्र चांगलचं तापलं होतं. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार सामना पाहायला मिळाला. शेतकरी आत्महत्या आणि दुष्काळ्याच्या मुद्द्यावर महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि काँग्रेसच्या आमदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. काँग्रेस आमदारांनी दुष्काळावर स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चेची मागणी केली. मात्र ही मागणी विधान परिषदेच्या अध्यक्षांनी फेटाळून लावलीय. तत्पूर्वी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह सर्व आमदारांनी दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्यांच्या मुद्यावर मोर्चा काढून विधिमंडळ आवारात प्रवेश केला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.