विरह सहन न झाल्यानं पतीच्या चितेवर पत्नीनं दिला जीव

पतीच्या चितेवर पत्नीचा जीव गेल्याची धक्कादायक घटना लातूरच्या औसा इथं घडलीय. 

Updated: Apr 1, 2015, 11:18 AM IST
विरह सहन न झाल्यानं पतीच्या चितेवर पत्नीनं दिला जीव  title=

लातूर: पतीच्या चितेवर पत्नीचा जीव गेल्याची धक्कादायक घटना लातूरच्या औसा इथं घडलीय. 

हृद्यविकारानं निधन झालेल्या पतीचे अंत्यसंस्कार उरकून सोमवारी पत्नी घरी आली. परंतु मध्यरात्रीपासून अचानक गायब झाली. सकाळी तिचा मृतदेह स्मशानभूमीत पतीच्या अस्थिशेजारी जळलेल्या अवस्थेत आढळून आला.

तुकाराम मसाजी माने (५५) आणि उषा माने (४५) अशी मृतांची नावं आहेत. पतीचा विरह सहन न झाल्यानंच तिनं चितेवरच स्वत:ची आहुती दिल्याची चर्चा गावात आहे. डिप्रेशनमध्ये असलेली ही महिला चितेशेजारी गेल्यानंतर साडीनं पेट घेतला असावा आणि यातून हे घडलं असावं, अशी शक्यता पोलीस अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी व्यक्त केली.

तुकाराम यांचा अंत्यविधी उरकून नातेवाईकांसह पत्नी उषा याही घरी आल्या. परंतु सकाळी त्या घरातून गायब दिसल्या. अखेर नातेवाईकांना पतीच्याा चितेशेजारी उषा यांचंही प्रेत अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आलं.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.