‘मातोश्री’ची मर्यादा ओलांडू नका - सुषमा स्वराज

सातत्यानं भाजपवर आणि पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केंद्रीय परराष्ट्र मंत्री आणि भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी टीका केलीय. आमच्या प्रचार यंत्रणेला ‘अफजल खाना’ची फौज असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’ भवनाची मर्यादा ओलांडू नये, असा सल्लाही त्यांनी दिलाय.

Updated: Oct 9, 2014, 10:38 AM IST
‘मातोश्री’ची मर्यादा ओलांडू नका - सुषमा स्वराज   title=

कुपवाड, सांगली: सातत्यानं भाजपवर आणि पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केंद्रीय परराष्ट्र मंत्री आणि भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी टीका केलीय. आमच्या प्रचार यंत्रणेला ‘अफजल खाना’ची फौज असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’ भवनाची मर्यादा ओलांडू नये, असा सल्लाही त्यांनी दिलाय.

उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानं आपल्याला खूप दु:ख झाल्याचं सुषमा स्वराज म्हणाल्या. शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यामुळं राजकीय नाती तुटली असली, तरी व्यक्तिगत नात्यात एवढा कडवटपणा नसावा, असा सल्ला केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज्य यांनी दिला. सांगली जिल्ह्यातील प्रचार सभेत सुषमा स्वराज्य बोलत होत्या.

शिवसेनेवर बोलणार नाही असं मोदींनी सांगितलं होतं. आम्हाला वाटलं होतं, भाषा संयमाचं पालन होईल, पण असं होतांना दिसत नसल्याचं स्वराज म्हणाल्या.  

पंधरा वर्षांपासून राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादीचं सरकार होतं, एक नंबर वर असलेला महाराष्ट्र शेतकरी आत्महत्येत आणि गुन्हेगारीमध्ये पहिल्या नंबरवर आला आहे. मागील पाच वर्षात कृषी दर निगेटिव्ह झाला आहे, या शब्दात स्वराज यांनी आघाडी सरकारवरही टीका केली.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.