पाकिस्तानच्या अभिनेत्याने भारताविषयी केलं मोठं वक्तव्य

भारत यंदा टी-२० वर्ल्डकपचा यजमान आहे. भारतात वर्ल्डकपचे सर्व सामने खेळले जाणार आहेत. पण पाकिस्तान हा सुरक्षेच्या कारणास्तव भारतात खेळण्यासाठी अजून तयार झालेलं नाही.

Updated: Mar 11, 2016, 04:40 PM IST
पाकिस्तानच्या अभिनेत्याने भारताविषयी केलं मोठं वक्तव्य title=

मुंबई : भारत यंदा टी-२० वर्ल्डकपचा यजमान आहे. भारतात वर्ल्डकपचे सर्व सामने खेळले जाणार आहेत. पण पाकिस्तान हा सुरक्षेच्या कारणास्तव भारतात खेळण्यासाठी अजून तयार झालेलं नाही.

पाकिस्तान एकीकडे सुरक्षेच्या मुद्दयावर अडून असतांना पाकिस्तानच्या एका अभिनेत्याने मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेता फवाद खानने म्हटलं आहे की, 'भारत असो की पाकिस्तान तुमच्यावर प्रेम करणारे आणि बाटल्या फेकणारे दोन्ही असू शकतात. त्यामुळे प्रेम करणारेच मिळावे असं विचार करणं चुकीचं आहे.'

पाकिस्तान सुरक्षेच्या बाबतीत रोज नवीन कारणं पुढे करत आहे. तर भारताचे गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी देखील लेखी काहीही देण्यास नकार दिला आहे. 

फवाद खान म्हणतो की, 'मी अनेक दिवसांपासून भारतात आहे. चित्रपटांच्या शुटींगसाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरत असतो. लोकांना माहित आहे की पाकिस्तानी आहे तरी मला कोणत्याही प्रकारची समस्या आलेली नाही.'

फवादने शेवटी म्हटलं की, पाकिस्तान पेक्षा त्याला भारतात सुरक्षित वाटतं.