'जगात कुठेही नाहीत, एवढे भारतात मुस्लिम सुरक्षित'

भाजपा खासदार जोगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे की, जगातील कोणत्याही भागात मुसलमान सुरक्षित नाहीत, एवढे सुरक्षित ते भारतात आहेत. कारण भारतातील बहुसंख्य जनता ही उदारमतवादी असल्याचं खासदार जोगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

Updated: Mar 2, 2015, 10:50 AM IST
'जगात कुठेही नाहीत, एवढे भारतात मुस्लिम सुरक्षित' title=

हुबळी : भाजपा खासदार जोगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे की, जगातील कोणत्याही भागात मुसलमान सुरक्षित नाहीत, एवढे सुरक्षित ते भारतात आहेत. कारण भारतातील बहुसंख्य जनता ही उदारमतवादी असल्याचं खासदार जोगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

हुबळीतील विराट 'हिंदू समावेश' मध्ये बोलतांना भाजपाचे खासदार जोगी आदित्यनाथ म्हणाले, "हिंदु स्वभावानेच उदारमतवादी आहे, आणि म्हणूनच देश देखिल उदारमतवादी आहे, त्यामुळे जगातील कोणत्याही भागात मुसलमान सुरक्षित नाहीत, एवढे सुरक्षित ते भारतात आहेत."

मदर तेरेसा यांच्यावर आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्यावर सुरात सूर मिळवतांना, आदित्यनाथ म्हणाले,  "गरीबांच्या सेवेच्या नावावर धर्म परिवर्तन करणे चुकीचे आहे." 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.