एका चित्रपटातून ५०० कोटी कमवणारे देश कसे सोडून जातील - कुरेशी

देशात सुरू असलेल्या असहिष्णूतेच्या वादावर अनेकांकडून अजूनही प्रतिक्रिया येत आहेत. शाहरूख खान आणि आमिर खान यांनी असहिष्णूतेच्या मुद्द्यावर केलेल्या वक्तव्यावर अजूनही टीका होत आहे.

Updated: Jan 31, 2016, 05:59 PM IST
एका चित्रपटातून ५०० कोटी कमवणारे देश कसे सोडून जातील - कुरेशी title=

नवी दिल्ली : देशात सुरू असलेल्या असहिष्णूतेच्या वादावर अनेकांकडून अजूनही प्रतिक्रिया येत आहेत. शाहरूख खान आणि आमिर खान यांनी असहिष्णूतेच्या मुद्द्यावर केलेल्या वक्तव्यावर अजूनही टीका होत आहे.

हास्यकलाकार एहसान कुरेशी यांनी ही आमिर आणि शाहरूख खानवर टीका केली आहे. 'एका चित्रपटात ५००-५०० कोटी रूपये कमावणारे देश सोडून कसे जातील. ते फक्‍त देश सोडून जाण्‍याच्‍या गोष्‍टीच करू शकतात.' अशी टीका त्यांनी दोघांवर केली आहे.