बिहार औरंगाबादमधील अपघातात 12 ठार

बिहार राज्यात औरंगाबाद येथे दिल्ली-कोलकाता महामार्गावर एक भरधार कंटेनर झोपलेल्या भाविकांना चिरडले. यामध्ये १२ भाविक जागीच ठार झालेत. यामध्ये ५ महिलांचा समावेश असून अन्य २२ जण जखमी झालेत. सोमवारी मध्यरात्री ही दुर्दैवी घटना घडली

Updated: Jul 29, 2014, 12:34 PM IST
बिहार औरंगाबादमधील अपघातात 12 ठार title=

औरंगाबाद : बिहार राज्यात औरंगाबाद येथे दिल्ली-कोलकाता महामार्गावर एक भरधार कंटेनर झोपलेल्या भाविकांना चिरडले. यामध्ये १२ भाविक जागीच ठार झालेत. यामध्ये ५ महिलांचा समावेश असून अन्य २२ जण जखमी झालेत. सोमवारी मध्यरात्री ही दुर्दैवी घटना घडली

झारखंडमधील देवगड मंदिर येतून दर्शन घेऊन परतणारे भाविक दिल्ली-कोलकता राष्ट्रीय महामार्गालगतच बसमध्ये आराम होते. यावेळी नियंत्रण सुटलेल्या कंटेनरने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला तर जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

झारखंडमधील देवगड येथून हे शिवभक्त परतत होते. रात्री बसमध्ये आराम करण्याच्या उद्देशाने त्यांनी रस्त्याच्या बाजूला बस लावली होती. तर काही जण रस्त्याच्या शेजारी झोपले होते. यावेळी भरधार कंटेनर त्यांच्या अंगावर गेला. या अपघाताप्रकरणी कंटेनर चालकाला अटक करण्यात आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.