अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी गणरायाचे आगमन

नाना पाटेकर यांच्या मोठ्या बंधूंचे निधन झाल्यामुळे यावर्षी पाटेकर कुटुंबीय साधेपणाने गणेशोत्सव साजरा करत आहेत. 

Updated: Sep 5, 2016, 11:06 PM IST

मुंबई  : अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी गणरायाचे आगमन झाले. नाना पाटेकर यांच्या मोठ्या बंधूंचे निधन झाल्यामुळे यावर्षी पाटेकर कुटुंबीय साधेपणाने गणेशोत्सव साजरा करत आहेत. 

यावेळी नानांनी एट्रोसिटी कायद्याची गरजच का पडते असा सवाल उपस्थित केला. 

तसंच सणासुदीला काहीतरी अघटीत घडेल की काय अशी सतत भीती वाटत असल्याची सल नानांनी बोलून दाखवली. नाम फाउंडेशनचे काम आणखी पुढे नेणार असल्याचा निर्धारही नानानं व्यक्त केला.