'मुंबईत येणारी गुंतवणूक रोखण्यासाठी शहराला बदनाम करण्याचा डाव?'

केवळ चित्रपटात भूमिका केल्याने कुणी खरंच 'झाशीची राणी' होत नाही; शिवसेनेचा कंगनावर पलटवार  

Updated: Sep 4, 2020, 03:59 PM IST
'मुंबईत येणारी गुंतवणूक रोखण्यासाठी शहराला बदनाम करण्याचा डाव?' title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई: एखाद्या चित्रपटात झाशीच्या राणीची भूमिका केली म्हणून कुणी प्रत्यक्षात झाशीची राणी होत नाही, असा टोला शिवसेनेकडून कंगना राणौतला लगावण्यात आला. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनाला चांगले फैलावर घेतले. त्यांनी म्हटले की, आम्ही मुंबईत सर्वांना सामावून घेतो. पण म्हणून कोणी वातावरण खराब करु नये. सरकारवर विश्वास नसेल तर त्या व्यक्तीला येथे राहण्याचा अधिकार नाही. तसेच कंगना राणौतकडे ड्रग्ज माफियांविरोधात पुरावे असतील तर तिने ते केंद्रीय गुन्हे अन्वेषण CBI विभागाकडे सोपवावेत. बॉलीवूडमधील काळा पडदा समोर आणावा, असे अनिल परब यांनी म्हटले. 

'कुणाच्या बापात हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा'

तसेच सध्या मुंबईविषयी सुरु असलेल्या उलटसुलट चर्चांमागे शहराला बदनाम करण्याचा डाव आहे. या सगळ्यामागे मुंबईत येणारी गुंतवणूक रोखण्याचे षडयंत्र आहे का? बॉलीवूड मुंबईतून दुसरीकडे हलवण्याचा डाव आहे का?, असे अनेक सवाल अनिल परब यांनी उपस्थित केले. 

कृतघ्न कंगनाच मानसिक संतुलन ढासळलंय, धनंजय मुंडेचं ट्विट

याशिवाय, कंगना पाकव्याप्त काश्मीरमध्ये कधी गेली होती? पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकव्याप्त काश्मीर भारतात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. जर तो प्रदेश इतका वाईट आहे तर मग भारतात का आणला जातोय? कंगनाचे समर्थन करणाऱ्या भाजपने याचे उत्तर द्यावे, असे अनिल परब यांनी म्हटले. 

'मुंबईत ज्यांना सुरक्षित वाटत नाही, त्यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही'
मुंबईत ज्यांना सुरक्षित वाटत नसेल त्यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नसल्याचे वक्तव्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी होते. त्यामुळे एखाद्या कलाकाराने मुंबई पोलिसांवर आरोप करणे, हे हास्यास्पद आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या हातात सुरक्षित आहे.. कायदा सुव्यवस्था ठेवण्यास पोलीस सक्षम असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.