हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प

हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. चेंबुर ते गोवंडीदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेले आहेत.

Updated: Jul 10, 2018, 07:30 PM IST

मुंबई : हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. चेंबुर ते गोवंडीदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेले आहेत. त्यामुळे मुंबईकडून पनवेलला जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. हा बिघाड दुरुस्त करायला आणखी काही वेळ लागणार आहे. त्यामुळे कामावरून घरी परत चाललेल्या प्रवाशांचे हाल होणार आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे सकाळपासूनच रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. मध्य रेल्वेची वाहतूक ३० मिनिटांपर्यंत उशीरा सुरु आहे. तर रुळाला तडा जायच्या आधी हार्बर रेल्वेची वाहतूक १५-२० मिनिटे उशीरानं सुरु होती. हार्बर रेल्वेवरची वाहतूक सुरळीत झाली नाही तर मुंबई-पनवेल रस्ता वाहतुकीवरही परिणाम होऊ शकतो.