राज्यात मान टाकणाऱ्या पिकांना दिलासा देणारा पाऊस

अनेक  भागात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता.

Updated: Aug 20, 2017, 01:32 PM IST
राज्यात मान टाकणाऱ्या पिकांना दिलासा देणारा पाऊस title=

मुंबई : राज्यातील अनेक भागात पावसानं दमदार पुनरागमन केलं आहे. कालपासून मुंबई, ठाणे, कोकणाला पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. राज्याच्या अनेक भागात मान्सून पुन्हा सक्रीय होत असून अनेक  भागात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता.

एरवी हवामान खात्याचा अंदाज चुकवणा-या पावसानं यावेळी मात्र हा अंदाज खरा ठरवला. मुंबई, उपनगरं आणि कोकणासह उउत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ तसंच मराठवाड्यात सगळीकडेच दमदार पाऊस सुरु झालाय.. पावसाच्या पुनरागमनामुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील शेतकरी सुखावला आहे.