भाजपच्या शिवार संवाद यात्रेवर काँग्रेसची टीका

विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेला उत्तर देण्यासाठी भाजपने काढलेल्या शिवार संवाद यात्रेवर काँग्रेसने जोरदार टीका केलीय. हा संवाद म्हणजे निव्वळ धुळफेक असल्याचं सांगत शेतक-यानीही पाठ फिरवलीय.

Updated: May 27, 2017, 11:24 PM IST
भाजपच्या शिवार संवाद यात्रेवर काँग्रेसची टीका title=

मुंबई : विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेला उत्तर देण्यासाठी भाजपने काढलेल्या शिवार संवाद यात्रेवर काँग्रेसने जोरदार टीका केलीय. हा संवाद म्हणजे निव्वळ धुळफेक असल्याचं सांगत शेतक-यानीही पाठ फिरवलीय.

तसेच दुस-यांवर महागड्या गाड्यांमधून फिरण्याची टीका करणारे स्वता महागाड्या गाड्यांमधून फिरताहेत. सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष 75 लाखांच्या मर्सिडीजमधून फिरताहेत. 

त्यांनी शेतक-यांबद्दल काढलेल्या अपशब्दामुळे शेतक-यांनी त्याच्या संवाद यात्रेकडे पाठ फिरवली असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला.