मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल

हिरेन कुटुंबियांच्या तक्रारीवरुन ATSनं दाखल केला गुन्हा  

Updated: Mar 7, 2021, 07:36 PM IST
मनसुख  हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल  title=

मुंबई : मनसुख  हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल झालाय. एटीएसनं हा गुन्हा दाखल केला.  मनसुख यांच्या मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार मनसुख यांच्या पत्नी विमला यांनी केली होती. त्यानंतर एटीएसनं हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एटीएसनं सगळी कागदपत्रं मुंब्रा पोलीस स्टेशनकडून ताब्यात घेतलीयत आणि पुढचा तपास सुरू केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मनसुख हिरेन यांच्या शरीरावर जखमा आढळल्या नाहीत. त्यांच्या मृतदेह जवळपास 10 तास पाण्यात असल्याची शक्यता शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होत आहे.  पण या खुणा कधीच्या आहेत, हे मात्र कळू शकलेलं नाही.

विस्तृत पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय आहे? 

मनसुख यांच्या चेहऱ्याच्या नागपुडीजवळ दीड सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटरती लाल खूण आहे. चेह-याच्या उजव्या बाजूकडील गालावर ८ सेंटीमीटर बाय ३ सेंटीमीटर एवढी मोठी गडद लाल रंगाची खूण आहे. इतकंच नाही तर उजव्या डोळ्याजवळ उजव्या बाजूला कानाच्या दिशेने गडद लाल रंगाची खूण आहे.

संध्याकाळी आलेल्या मनसुख हिरेन यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये कोणताही घातपात नसल्याचा उल्लेख तसंच शरीरावर कोणत्याही जखमा नसल्याची माहिती समोर आलेली. मात्र आता विस्तृत अहवालानुसार शरीरावर काही खुणा असल्याचं उघडकीस आलं आहे. पण या खुणा त्यांचा मृत्यू झाला त्यावेळच्याच आहेत, की आधीच्या हे अद्याप डॉक्टरांकडून कळलेलं नाही.