प्रदूषण टाळण्यासाठी बेस्टची इकोफ्रेंडली इलेक्ट्रीक बस

राजधानी दिल्लीत प्रदूषणानं धोक्याची पातळी गाठलेली असताना मुंबईतही अशी परिस्थिती येऊ शकते. याचा विचार करून बेस्ट आता इकोफ्रेंडली इलेक्ट्रीक बस मुंबईच्या रस्त्यांवर उतरवते आहे. यामुळं कुठल्याही प्रकारचे वायू आणि ध्वनी प्रदूषण होणार नाही.

Updated: Nov 9, 2017, 12:02 PM IST
प्रदूषण टाळण्यासाठी बेस्टची इकोफ्रेंडली इलेक्ट्रीक बस title=

मुंबई : राजधानी दिल्लीत प्रदूषणानं धोक्याची पातळी गाठलेली असताना मुंबईतही अशी परिस्थिती येऊ शकते. याचा विचार करून बेस्ट आता इकोफ्रेंडली इलेक्ट्रीक बस मुंबईच्या रस्त्यांवर उतरवते आहे. यामुळं कुठल्याही प्रकारचे वायू आणि ध्वनी प्रदूषण होणार नाही.

एकीकडे दिल्लीमध्ये प्रदूषणामुळे सकाळच्या वेळात घराच्या बाहेर न पडण्याच्या इशारा सरकारनं नागरिकांना दिला आहे. लहान मुलं आणि श्वसनविकार असणाऱ्यांनी घराबाहेर पडणे अत्यंत धोकादायक असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. प्रदूषणाचा स्तर खाली यावा म्हणून दिल्लीत अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक वगळता इतर कुठल्याही मालवाहक वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील बांधाकामांचे सर्व प्रकल्प अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहेत. रस्त्यावर वाहनांची संख्या कमी व्हावी यासाठी दिल्ली मेट्रोरेल कॉर्पोरेशननं गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतलाय. प्रदूषणाचा स्तर जोपर्यंत 200 PPM च्या खाली आहे तोवर धोका कायम असल्याचं इंडियन मेडिकल असोशिएशननं म्हटलं आहे.