मटण रस्सा झणझणीत हवा म्हणून त्यानं बायकोला...

 ऐकावं ते नवलच असला काहीसा प्रकार ही तक्रार ऐकल्यावर येतोय.

Updated: Jun 11, 2022, 05:06 PM IST
मटण रस्सा झणझणीत हवा म्हणून त्यानं बायकोला...   title=

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : ऐकावं ते नवलच असला काहीसा प्रकार ही तक्रार ऐकल्यावर येतोय. औरंगाबाद येथे राहणाऱ्या जोडप्याचे 4 महिन्यांपूर्वी लग्न झाले. मुलीच्या घरातील सगळे शुद्ध शाकाहारी तर त्या उलट सासरमध्ये सगळे मांसाहारी. त्यामुळे सासरी मांसाहाराचे जेवण बनवावे लागते. मात्र बायकोला मांसाहारी जेवण बनवता येत नाही. त्यामुळे नवऱ्याने तिचा छळ सुरु केला आहे. या प्रकाराला वैतागून ती आता पोलीस ठाण्यात गेली आहे.   

औरंगाबाद येथे राहणाऱ्या जोडप्याचे 4 महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. बायको शाकाहारी असल्याने तिला मांसाहारी जेवण बनवता येत नव्हते. त्यामुळे नवऱ्याकडून सातत्याने यावरून टोमणे, छळ असले प्रकार होत होते. सासरी आल्यावर आठवड्यातुन 3 वेळ ही लोक मांसाहार करत असल्याचं त्या बायकोने म्हटलंय. ती बिचारी शाकाहारी पण तिचा नवरा तिला मटण बनवायला शिक असा आग्रह धरू लागला.

या प्रकाराला वैतागून पत्नीने अखेर औरंगाबाद पोलिसांचे भरोसा सेल गाठला आणि थेट तक्रार दिली. मटण बनवता येत नाही म्हणून नवरा छळ करतो अशी तक्रार औरंगाबाद पोलिसांच्या भरोसा सेलमध्ये पत्नीने केली आहे. लग्नाला ४ अवघे महिने झाले मात्र मटण येत नाही म्हणून, हिणवणे, छळ सुरुय यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पत्नीने केलीय. त्यामुळं पोलिसांना सुद्धा त्या पतीला आणि सासरच्या लोकांना बोलावून घ्यावे लागले.

संसार म्हणजे 2 चाकांची गाडी, एकमेकांना यात सांभाळून घ्यावं लागतं, मात्र अगदी क्षुल्लक कारणासाठी वाद पोलीस स्टेशन पर्यंत जातात हे योग्य नाही, सध्या महिला अत्याचारात राज्याचा देशात तिसरा क्रमांक आहे, मात्र त्यात अशा पद्धतीच्याही तक्रारी अंतर्भूत असू शकतात, त्यामुळं संसार करताना संयम ठेवून वागणं गरजेचं आहे अथवा संसाराचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही..