पोलीस शिपायाने केली ३ लग्नं; झाला निलंबीत

धक्कादायक आरोप असा की, या लग्नांबाबत या तिघींना कानोकानी खबर देखील नव्हती

Updated: May 21, 2018, 12:29 PM IST
पोलीस शिपायाने केली ३ लग्नं; झाला निलंबीत title=

पुणे : एका पोलीस शिपायाने थेट पोलीस खात्यालाच अंधारात ठेवत मोठा कारनामा केला आहे. त्याचा हा कारनामा उघड झाला तेव्हा, मात्र त्याला निलंबीत करण्यात आले. पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यांतर्गत सेवेत असलेल्या या पोलीस शिपायाने चक्क ३ लग्नं केली आहेत. या पोलीस शिपायाच्या क्रमांक दोनच्या पत्नीने केलेला धक्कादायक आरोप असा की, या लग्नांबाबत या तिघींना कानोकानी खबर देखील नव्हती. या महाभागाने प्रत्येक पत्नीला आपले केवळ तुझ्याच सोबत लग्न झाले आहे हे पटवून दिले होते.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिपाई विजय जाधव (वय-३८) याचा पहिल्या पत्नीसोबत बारामती कोर्टात गेले तीन वर्षांपासून खटला सुरू आहे. त्याने २४ डिसेंबर २०१६ ला अन्य एका महिलेसोबत गुपचूप विवाह केला. महिलेने दावा केला आहे की, त्याने आणि त्यांच्या कुटुंबियांनी पहिल्या लग्नाची ही गोष्ट तिच्यापासून लपवून ठेवली. तसेच, पहिल्या पत्नीसोबत त्याचा घटस्फोटही झाला नाही.

पुणे मिररने दिलेल्या वृत्तानुसार, महिलेने म्हटले आहे की, विजय जाधव हा तिचा पती जेव्हा आगोदरच विवाहीत असल्याचे त्याला समजले तेव्हा, तिने त्याच्याकडे त्याबाबत विचारणा केली. तिच्या प्रश्नांचा राग आल्याने विजयने तिला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर तो तीला दररोज मारहाण आणि त्रास देऊ लागला. अखेर आपला जीव वाचवून तिने माहेर गाठले.

पहिली बायोक माहेरी जाताच दुसऱ्या बायकोसाठी शोधाशोध

कमाल अशी की, दुसरी बायको माहेरी जाताच विजय जाधवने थेट तिसऱ्या बायकोसाठी स्थळ शोधणे सुरू केले. १२ डिसेंबर २०१७ मध्ये त्याने तिसरे लग्न केले. विशेष म्हणजे त्याने तिसऱ्या बायकोपासूनही पहिली दोन लग्नं झाल्याची माहिती लपवून ठेवली. महिलेने आरोप केला आहे की, त्याने तीसऱ्या लग्नातही मुलींकडच्या मंडळीकडून ५०,००० रूपये हुंडा म्हणून घेतले आहेत. 

दरम्यान, विजयच्या दुसऱ्या पत्नीला त्याच्या तिसऱ्या लग्नाबाबत कळले तेव्हा तिने लोनीखंड पोलीस टाण्यात ११ एप्रिल २०१८मध्ये त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी विजय आणि त्याचे वडील लक्ष्मण तसेच, त्याच्या भावांविरोधातही भा.दं.सं.च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस प्रशासनाने पोलीस कर्मचाऱ्याल केले निलंबीत

दरम्यान, पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पोलीस दलातील वरिष्ठांना जेव्हा विजयने तीन लग्नं करून फसवणूक केल्याबाबत तक्रार दाखल झाल्याची माहिती समजली तेव्हा त्याला थेट निलंबीत करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाने विजयचे कृत्य अत्यंत गंभीर असल्याच्या कारणावरून त्याचे निलंबन केल्याचे समजते.