सुप्रिया सुळेंची पंतप्रधानांवर टीका

 युवा संवाद यात्रेच्या निमित्ताने त्या जळगावात आल्या होत्या. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 13, 2017, 02:12 PM IST
सुप्रिया सुळेंची पंतप्रधानांवर टीका title=

मुंबई : ना खाऊंगा, ना खाने दूंगा असं म्हणणाऱ्या भाजपा सरकारमधील भ्रष्टाचार कुठे थांबलाय ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. युवा संवाद यात्रेच्या निमित्ताने त्या जळगावात आल्या होत्या. यावेळी त्यांनी पंतप्रधान आणि भाजपाला हा टोला लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ना खाऊंगा ना खाणे दूंगा या वाक्याचा अर्थ तर आता उपासमारीला लागू पडत असल्याचा उपरोधिक टोला सुळे यांनी लगावला आहे. याच वेळी विद्यार्थ्यांनी राजकारणातल्या घराणेशाहीवर प्रश्न विचारला. त्यावर माझी मुलं राजकारण येणार नाही असं उत्तर त्यांनी दिलं.