रत्नागिरीत ट्रक आणि रिक्षात ठोकर, दोन जण ठार

 रस्त्यावर ट्रक आणि रिक्षा अपघातात दोन जण ठार झाले आहेत.

Updated: Nov 16, 2019, 10:06 AM IST
रत्नागिरीत ट्रक आणि रिक्षात ठोकर, दोन जण ठार  title=

प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : रत्नागिरी कुवारबाव येथे एक भीषण अपघात झाला आहे. इथल्या रस्त्यावर ट्रक आणि रिक्षा अपघातात दोन जण ठार झाले आहेत. यामध्ये एका 13 वर्षाच्या मुलाचा देखील समावेश आहे. कुवारबाव पाटबंधारे येथून हॉटेल कंचन कडे जाणाऱ्या रस्तावर हा अपघात झाला आहे. 

जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र यातील दोघांचा अंत झाला. या अपघातातील रिक्षा चालक हा देखील गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.