नागपूर अधिवेशन : शेतकरी कर्जमाफी मुद्यावर पुन्हा सरकारला विरोधकांनी घेरले

हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधक पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या इतर मुद्यांवर सरकारला पुन्हा एकदा घेरण्यास सुरुवात केलीय. 

Updated: Dec 13, 2017, 03:04 PM IST
नागपूर अधिवेशन : शेतकरी कर्जमाफी  मुद्यावर पुन्हा सरकारला विरोधकांनी घेरले  title=

नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधक पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या इतर मुद्यांवर सरकारला पुन्हा एकदा घेरण्यास सुरुवात केलीय. 

कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब

विधानसभेत कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या यादीसाठी विरोधकांनी दिवसाच्या सुरूवातीलाच गोंधळ घातला. कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. 

स्थगन प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळला

कामकाज सुरु झाल्यावर आज अजित पवारांनी स्थगन प्रस्ताव मांडला. पण तोही विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. त्यावर कामकाजातून बोंड अळी प्रकरणी विधानसभेतील लक्षवेधी पुढे ढकलली. आणि विरोधी पक्ष आणखी आक्रमक झाले. 

CMकडून विरोधकांना समजावण्याचा प्रयत्न 

विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सरकार मुद्दाम बाजूला टाकत असल्याचा आरोप अजित पवारांनी केला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी गोंधळात विरोधकांना समजावण्याचाही प्रयत्न केला. शेवटी प्रतिष्ठेचा विषय न करता विरोधकांनी चर्चेला सुरूवात करावी अशी मुख्यमंत्र्यांनी केली. 

त्यानंतर झालेल्या गदारोळानं पुन्हा एकदा कामकाज १० मिनिटं तहकूब झालं.त्यानंतर विधानसभेत शेतकऱ्यांच्या विविध मुद्दयांवर चर्चा सुरू आहे.