BIG NEWS । सरकारचा मोठा निर्णय; राज्यात मेगा पोलीस भरती, 12 हजार पदे भरणार

राज्यात लवकरच मेगा पोलीस भरती (Police Recruitment) होणार आहे. डिसेंबरपर्यंत ही पोलीस भरती करणार आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Home Minister Dilip Walse-Patil) यांनी दिली.

Updated: Jul 13, 2021, 09:50 AM IST
BIG NEWS । सरकारचा मोठा निर्णय; राज्यात मेगा पोलीस भरती, 12 हजार पदे भरणार   title=

मुंबई / औरंगाबाद : राज्यात लवकरच मेगा पोलीस भरती (Police Recruitment) होणार आहे. डिसेंबरपर्यंत ही पोलीस भरती करणार आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Home Minister Dilip Walse-Patil) यांनी दिली आहे. राज्यात सुमारे 5 हजार पेालिसांची भरती करण्यात येईल. त्यानंतरच्या टप्प्यात सुमारे 7 हजार पोलिसांची भरती करण्यात येईल अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली. (Mahavikas Aghadi government's big decision; Mega police recruitment in Maharashtra) औरंगाबाद पोलीस परिक्षेत्रांतर्गत कायदा व सुव्यवस्था अंमलबजावणीबाबत झालेल्या आढावा बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील बोलत होते.  यावेळी त्यांनी कायदा सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गुन्हे सिध्दतेचे प्रमाण वाढवण्याचे निर्देश दिले.

औरंगाबाद परिक्षेत्रातील गुन्ह्यांचे प्रमाण अधिक असल्याने पोलिसांनी अधिक सक्षमपणे तपास करणे गरजेचे आहे. पोलीस दलात कर्मचारी हा घटक महत्त्वाचा असून त्याची तपासात देखील भूमिका महत्त्वाची आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घ्या आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य द्या. लोकप्रतिनिधींच्या बाबतीत असणारा राजशिष्टाचार प्राधान्याने पाळा, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी यावेळी सांगितले.

डिसेंबरपर्यंत राज्यात पोलीस दलातील भरतीत12 हजार 200 पदांपैकी 5 हजार 200 पदे डिसेंबरपूर्वी भरणार आहेत. त्यानंतरच्या टप्प्यात सुमारे 7 हजार पोलिसांची भरती करण्यात येईल. पोलीस सेवेत कर्मचारी दाखल झाल्यानंतर संबंधित कर्मचारी किमान पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवानिवृत्त व्हावा, त्यादृष्टीने योजना बनविण्यात येत आहे. जिल्ह्यांमध्ये पोलीस दल अधिक सक्षम बनविण्यासाठी जिल्हा वार्षिक निधीतून निधीची मागणी करा. कोरोना काळात पोलीस दलाने कौतुकास्पद कामगिरी केल्याचेही गृहमंत्री म्हणाले.

यावेळी गृहमंत्र्यांनी बैठकीपूर्वी आयुक्तालयातील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाला भेट दिली. बैठकीमध्ये विविध पुस्तिकांचे विमोचन गृहमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आले. दरम्यान, सायबर, आर्थिक गुन्हेगारीचा बिमोड करावा - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील तंत्रज्ञानाचा गैरवापर करुन नागरिकांची फसवणूक करण्याच्या प्रकारात वाढ होत आहे.  पोलिसांनी  प्रभावीपणे कारवाई करत सायबर आणि आर्थिक गुन्हेगारीचा बिमोड करावा, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.