रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट

राज्यात अनेक ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी

Updated: Jul 20, 2021, 07:42 PM IST
रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट title=

मुंबई : मुंबई, ठाणे आणि कोकणाला गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढल्यानंतर आता गड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यात २ दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी सखोल भागात पाणी साचल्याच्या घटना ही समोर आल्या. आता काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली असली तरी हवामान खात्याने पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे.