एका रात्रीत असं काय घडल? अहमदनगरमध्ये विहिरीत चार मृतदेह आढळल्याने खळबळ

अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील माळीबाभूळगाव इथल्या एका विहिरीत चार मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडालीय.. सांगडे कुटुंबातील चौघांचे हे मृतदेह असल्याचं समजतंय.

Updated: Jun 22, 2023, 09:40 PM IST
एका रात्रीत असं काय घडल? अहमदनगरमध्ये विहिरीत चार मृतदेह आढळल्याने खळबळ title=

Ahmednagar Crime News:  अहमदनगर जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील बाभूळगावमध्ये एकाच विहरीत चार मृतदेह आढळले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत (Crime News In Marathi) मृतदेह ताब्यात घेतले आहेत. रात्रीच्या वेळेस यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे एका रात्रीत असं काय घडल?  सामूहिक हत्या आहे की आत्महत्या याचा तपास पोलिस करत आहेत. 

एकाच कुंटुबातील चौघांचे मृतदेह सापडल्याने खळबळ

कांचन सांगडे, निखिल सांगडे, निशिधा सांगाडे आणि संचिता सांगडे अशी मृतांची नावे आहेत. सर्व जण एकाच कुंटुबातील आहेत. रात्रीच्या वेळेस यांचा मृत्यू झाला असून सकाळी यांचे मृतदेह विहीरीत आढळून आले आहे. या प्रकाराची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

मृत महिलेचा पती सोबत वाद

कांचन सांगडे आणि तिची 3 मुले निखिल, निशिधा आणि संचिता यांचे हे मृतदेह आहेत. सांगडे परिवार नांदेड जिल्ह्यातील आहे. कांचन सांगडे हीचा पती धम्मपाल हा एका पॉल्ट्रीफार्ममध्ये काम करतो.  कांचन आणि तिचा पती धम्मपाल यांच्यात वाद झाला होता. यानंतर कांचनसह तिच्या 3 मुलांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही हत्या आहे की आत्महत्या हे समजू शकलेले नाही. कांचन सांगडे हीचा पती धम्मपाल याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे. 

डॉक्टरनं अख्खं कुटुंबच संपवलं

डॉक्टरनं पत्नीचा खून करून 2 मुलांना विहिरीत टाकून स्वतःसह अख्खं कुटुंबच संपवल्याचा धक्कादायक प्रकार दौंड तालुक्यातील वरवंड येथे उघडकीस आला होता. अंगावर शहरे आणणाऱ्या या घटनेने संपूर्ण पुणे जिल्हा हादरून गेला. पशुवैद्यकीय डॉक्टर अतुल दिवेकर यांनी कौटुंबिक वादातून हे कृत्य केलंय. लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत बायकोच्या त्रासाला कंटाळून आपण तिला मारून टाकले असून एक मुलगा आणि एक मुलगी यांना गणेशवाडी तालुका दौंड येथील जगताप विहिरीमध्ये मारून टाकले असून आपण स्वतःही जीवन संपवत असल्याचं त्यांनी चिठ्ठत म्हंटलं.