नाशिकमध्ये आयटीआयच्या परीक्षेत गोंधळ

नाशिकमध्ये आयटीआयच्या परिक्षेत गोंधळ उडालाय.. २२००पैकी तब्बल ११०० विद्यार्थ्यांना नापास करण्यात आलंय. 

Updated: Sep 16, 2017, 02:06 PM IST
नाशिकमध्ये आयटीआयच्या परीक्षेत गोंधळ title=

नाशिक : नाशिकमध्ये आयटीआयच्या परिक्षेत गोंधळ उडालाय.. २२००पैकी तब्बल ११०० विद्यार्थ्यांना नापास करण्यात आलंय. 

इतकंच नव्हे तर चक्क नापास झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 700 विद्यार्थ्यांना शून्य मार्क देण्यात आलेत. काही विद्यार्धी परीक्षेला उपस्थित असतानाही त्यांना अनुपस्थित दाखवण्यात आलंय.

यासंदर्भात विद्यार्थ्यांनी ITIप्रशासनाकडे दाद मागितली मात्र प्रशानानं त्यांच म्हणण ऐकण्यास नकार दिलाय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कॉलेजबाहेर गोंधळ घातलाय.