पालकांमध्ये भांडण झाल्यावर मुलांद्वारे एकमेकांना निरोप देताय? याचा परिणाम कसा होतो?

जेव्हा पालकांमध्ये भांडण होतं तेव्हा मुलांना संवादाचं माध्यम बनवलं जातं. काही सांगायचे असेल तर मूल त्याचे माध्यम बनते. हे करणे योग्य आहे का?

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Mar 2, 2024, 05:51 PM IST
पालकांमध्ये भांडण झाल्यावर मुलांद्वारे एकमेकांना निरोप देताय? याचा परिणाम कसा होतो? title=

अनेकदा असे दिसून येते की पालक बरेच दिवस एकमेकांशी बोलत नाहीत आणि जेव्हा एखादी गोष्ट चर्चा करायची असते तेव्हा मुले त्यांचे निरोप पाठवतात. कधीकधी पालक मुलांवर आपल्या भांडणाचा राग काढतात. ज्यातून आई किंवा वडील एकमेकांवर राग काढतात आणि कधीकधी मुलांना पालकांपैकी एकाची बाजू घेण्यास सांगितले जाते.

जेव्हा पालक एकमेकांशी बोलत नाहीत आणि त्याऐवजी त्यांच्या मुलासारख्या तिसऱ्या व्यक्तीचा वापर करतात, तेव्हा त्याला 'त्रिकोणासन' असे म्हणतात. मोठे होत असताना, आपल्यापैकी बहुतेकांbj ही परिस्थिती आली आहे परंतु मानसशास्त्रज्ञांनुसार, पालकांच्या या सवयीचा मुलांवर खोलवर परिणाम होतो. जाणून घेऊया 'त्रिकोणासन' म्हणजे नक्की काय आणि ते का करणं गरजेचं आहे.

त्रिकोणासन म्हणजे काय?

त्रिकोणासम ही एक संकल्पना आहे जी सामान्यतः पालक आणि मूल यांच्यामध्ये दिसते. जेव्हा पालक आपल्या वादात मुलांना हस्तक्षेप करायला लावतात. त्रिकोणासनाचा मुलांच्या भावनिक आरोग्यावर, सामाजिक विकासावर आणि एकूण कौटुंबिक जाणीवेवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो.

मुलांवर होतो परिणाम 

याचा परिणाम कुटुंबातील संवादावर होतो. जेव्हा एखादा वाद होतो तेव्हा तो थेट सोडवण्याऐवजी आपण तिसऱ्या व्यक्तीला म्हणजे आपल्या मुलांना वादात अडकवतात. यामुळे मुलांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या सगळ्यात मुलं गुरफटलं जातं आहे याची जाणीवही मुलाला नसते. काही दिवसांनी मूल आणि पालक यांच्यातील विश्वास आणि जवळीक कमी होते.

मुलाचा आत्मविश्वास कमी होणे

पालकांच्या या गोष्टी मुलांच्या भावनिक आरोग्यावर परिणाम करतात. जेव्हा एखाद्या मुलाचा वापर इतरांमधील मतभेद सोडवण्यासाठी केला जातो तेव्हा त्याचा मुलावर नकारात्मक परिणाम होतो. यामुळे मुलामध्ये चिंता, नैराश्य, कमी आत्मसन्मान आणि राग यासारखे अनेक भावनिक आणि देहबोलीत फरक होऊ शकतात. यामुळे मुलाची समस्या सोडवण्याची क्षमता देखील कमी होऊ शकते.

हे कसे ओळखाल?

घरामध्ये त्रिकोणासनासारखे काही घडत आहे की नाही आणि त्याचा तुमच्या मुलावर काही वाईट परिणाम होत आहे की नाही हे जाणून घ्यायचे असेल तर तुमच्या मुलाशी याविषयी मोकळेपणाने बोला. घरामध्ये असे वातावरण ठेवा जेथे मतभेद योग्य प्रकारे सोडवता येतील.

काय कराल?

मुलांमधील ही समस्या सोडवण्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे. पालकांनी आपले वाद आपल्यातच ठेवावेत. यासाठी, आपण मुलाचे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे आणि मतभेद सोडवण्याच्या मार्गांचा विचार केला पाहिजे.