लाल किल्ल्यावर फडकवला जाणारा तिरंगा कोठे आणि कसा तयार होतो

तिरंगा ध्वज कोण बनवतो आणि कसा बनवला जातो?

Updated: Aug 14, 2018, 12:42 PM IST
लाल किल्ल्यावर फडकवला जाणारा तिरंगा कोठे आणि कसा तयार होतो title=

नवी दिल्ली : देशभरात 72 व्या स्वातंत्र्य दिनाची तयारी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणार आहेत. देशात आणि जगभरात अनेक ठिकाणी तिरंगा फडकवला जाणार आहे. पण तुम्हाला कदाचित माहिती नसेल की तिरंगा कोण बनवतं. तिरंगा ध्वज कोण बनवतो आणि कसा बनवला जातो याबाबत अनेकांना माहिती नसेल. कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघ भारतीय ध्वज बनवतात.

कोण बनवतं तिरंगा ध्वज?

कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघच फक्त देशातील आणि जगभरातील अधिकृत ध्वज बनवतात. हुबळी येथे तिरंगा ध्वज बनवला जातो. या संघांची स्थापना 195 7 मध्ये झाली होती पण खादी बनवणं येथे 1982 पासून सुरु झालं. दरवर्षी येथे हजारो तिरंगा बनतात. या वर्षी 25 हजाराहून अधिक ध्वज बनवले गेले आहेत. मागच्या वर्षी ध्वजामधून 2.5 कोटी रुपयांची कमाई संघाला झाली होती. यावर्षी हा आकडा 3 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

फेडरेशनला 2005-06 मध्ये ब्‍यूरो ऑफ इंडियन स्‍टँडर्ड्स (BIS) ने सर्टिफिकेशन दिलं होतं. बीआयएस तिरंग्याची क्वालिटी चेक करतात. तिरंग्याची 18 प्रकारची क्वॉलिटी चेक केली जाते. एक छोटासा जरी डिफेक्ट असेल तरी तो ध्वज रिजेक्ट केला जातो.

350 हून अधिक जण बनवतात तिरंगा

दरवर्षी 350 हून अधिक लोकं देश आणि विदेशात पाठवण्यासाठी तिरंगा बनवतात. यामध्ये महिलांचं प्रमाण अधिक आहे. ध्वज व्यतिरिक्त हे युनिट खादीच्या अन्य गोष्टी देखील बनवतात.

असा तयार केला जातो तिरंगा

तिरंगा तयार करण्याची मोठी प्रतिक्रिया आहे. सगळ्यात आधी फेडरेशनच्या बागलकोट यूनिटमध्ये हाय क्‍वॉलिटीच्या कच्‍च्या कॉटनचा धागा बनवला जातो. यानंतर गाडनकेरी, बेलॉरू, तुलसीगिरीमध्ये कपडा तयार केला जातो. कपडा तयार झाल्यानंतर हुबळी युनिटमध्ये डाय आणि इतर प्रक्रिया केल्या जातात. तिरंगा बनवण्यासाठी फक्त कॉटन आणि खादीचा उपयोग केला जातो. क्वॉलिटी चेक झाल्यानंतर तिरंगा बाहेर पाठवला जातो.

तिरंगा तयार करतांना खूप काळजी घेतली जाते. बीआयएस आणि केवीआयसीद्वारे दिलेल्या रंगांचाच यामध्ये वापर केला जातो. कोणता रंग किती प्रमाणात असावा हे देखील निश्चित केलेलं असतं. तिरंगा ध्वजावरील अशोक चक्राचा आकार देखील नियमानुसार ठरलेला असतो. तिरंगा बनवतांना आकार, लांबी, रुंदी आणि इतर सर्व मानदंड लक्षात घेतले जातात.