बेळगाव 'लोकशाही'नं मिळालं नाही तर 'ठोकशाही'नं घेऊ - राऊत

महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सिमेवर असलेलं बेळगाव महाराष्ट्राचाच एक भाग आहे... न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत हा भाग सरकारनं केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावा, अशी मागणी शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी बेळगावातील एका जाहीर सभेत केलंय. 

Updated: Mar 30, 2018, 02:00 PM IST
बेळगाव 'लोकशाही'नं मिळालं नाही तर 'ठोकशाही'नं घेऊ - राऊत title=

मुंबई : महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सिमेवर असलेलं बेळगाव महाराष्ट्राचाच एक भाग आहे... न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत हा भाग सरकारनं केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावा, अशी मागणी शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी बेळगावातील एका जाहीर सभेत केलंय. 

गुरुवारी २९ मार्च रोजी बेळगावात खासदार संजय राऊत दाखल झाले होते.... 'आम्हाला बेळगावात जाण्याची परवानगी हवीय... पाकिस्तानात जाण्याची नाही. बेळगाव महाराष्ट्राचाच एक भाग आहे... दोघांचा इतिहास सारखाच आहे, दोघांची संस्कृती सारखीच आहे. या सीमावर्ती भागावर कोर्टाचा निर्णय येईलच. पण तेव्हापर्यंत हे क्षेत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात यावं, अशी आम्ही मागणी करतोय' असं त्यांनी या जाहीर सभेत म्हटलंय.

जेव्हा कधी बेळगाव आणि इतर सीमावर्ती भागातील नागरिकांवर अन्याय होतो, तेव्हा त्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या सर्वच भागांत दिसून येतोय. काश्मीर, सतलज आणि बेळगावचा प्रश्न लोकशाही पद्धतीनं सोडविला जात नसेल तर तो आम्ही 'ठोकशाही'नं सोडवू, असंही संजय राऊत यांनी म्हटलंय.