दसऱ्यानंतर आता दिवाळीतही दुर्घटना...रेल्वेने इतक्या जणांना चिरडलं

अशी घटना घडू नये म्हणून एक अधिकारी नियुक्त करण्यात आला होता.

Updated: Nov 5, 2018, 05:53 PM IST
दसऱ्यानंतर आता दिवाळीतही दुर्घटना...रेल्वेने इतक्या जणांना चिरडलं title=

नवी दिल्ली : देशभरात धनत्रयोदशी साजरी केली जात असताना दुसरीकडे तीन गॅंगमॅनचा ट्रेनखाली चिरडून मृत्यू झालायं. उत्तर प्रदेशच्या हरदोईमध्ये रेल्वेचा निष्काळजीपणा समोर आलायं. सोमवारी कोलकाता-अमृतसर एक्सप्रेस जाताना तिघांच्या अंगावरून गेली. गॅंगमॅन रेल्वे रुळावर डागडुजीचे काम करत असताना वेगाने आलेल्या ट्रेनखाली ते चिरडले गेले. दुपारी 11 वाजून 55 मिनिटांनी रेल्वे ट्रॅकवर डागडूजी काम करण्याच काम तिघे गॅंगमॅन करत होते. यावेळी कोणता ब्लॉक नव्हता पण तिघांना अशाप्रकारच्या डागडूजीच्या सुचना मिळाल्या होत्या.

प्रकरणाची चौकशी 

यावेळी वेगाने आलेल्या अकाल तख्त एक्सप्रेसच्या फेऱ्यात हे तिघेजण आले. सूचना मिळताच रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरणाची चौकशी करत आहेत.

अशी घटना घडू नये म्हणून एक अधिकारी नियुक्त करण्यात आला होता.

असं असतानाही देखील अशाप्रकारची दुर्घटना समोर आली आहे.

अमृतसर दुर्घटना

रावण दहनच्यावेळी भीषण रेल्वे अपघात झालाय. रावणदहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी अनेक जण रेल्वे रुळावर येऊन उभे होते. त्याच वेळी वाऱ्याच्या वेगानं येणाऱ्या जालंदरहून अमृतसर मेलनं रुळावर उभे असलेल्या अनेकांना चिरडलं.

या अपघातात 60 हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर ७२ हून अधिक जण जखमी झालेत.

घटना घडली त्यावेळी समोरच्या बाजुनंही दुसरी गाडी आल्यामुळे लोकांना पळायला संधीच मिळाली नसल्याचं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली होती.