पाकिस्तानच्या गोळीबारात ४ जवान शहीद

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच आहे. 

Updated: Jun 13, 2018, 11:43 AM IST

मुंबई : पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच आहे. जम्मूमधल्या सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात भारताचे चार जवान शहीद झालेत. तर तीन जवान जखमी झालेत. कालही पुलवामा भागात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले होते. तर अनंतनागमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १० जवान जखमी झाले होते. रमजानच्या काळातही पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन आणि गोळीबार सुरूच आहे.