तुमच्या नेहमीच्या 'या' वाईट सवयी ठरताय तुमची किडनी खराब होण्यासाठी कारणीभूत, त्या आताच बदला

अनेक लोक मधुमेह, हृदयरोग आणि उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांना बळी पडतात, ज्याचा परिणाम त्यांच्या किडनीला देखील होऊ लागतो. 

Updated: Jul 18, 2022, 04:02 PM IST
तुमच्या नेहमीच्या 'या' वाईट सवयी ठरताय तुमची किडनी खराब होण्यासाठी कारणीभूत, त्या आताच बदला title=

मुंबई : आपल्या सर्वांना माहित आहे की किडनी आपल्या शरीरातील सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपल्या शरीरात दोन मूत्रपिंड आहेत आणि त्या दोन्ही निरोगी असणे आवश्यक आहे जेणेकरून आपले शरीर देखील निरोगी राहते. परंतु हल्ली अनेकांना किडनी निकामी होण्याचा त्रास जास्त उद्भवत आहे. पण तुम्हाला माहित आहे का किडनी खराब का होते? यामागे अनेक कारणं असू शकतात, त्यापैकी काही तुमच्या वाईट सवयी देखील आहेत. तुम्ही जर त्या वाईट सवयी बदलल्यात तर तुम्ही या आजारांना बळी पडण्यापासून वाचू शकता. चला तर जाणून घेऊ या.

अनेक लोक मधुमेह, हृदयरोग आणि उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांना बळी पडतात, ज्याचा परिणाम त्यांच्या किडनीला देखील होऊ लागतो. या आजारांमुळे किडनी आपल्या शरीरातील द्रव फिल्टर करू शकत नाही आणि हळूहळू ती खराब होऊ लागते. चला जाणून घेऊया दैनंदिन जीवनातील अशा 5 सवयींबद्दल, ज्या तुमच्या किडनीला हानी पोहोचवतात.

1- एक्टिव्ह नसल्यामुळे मूत्रपिंडाच्या समस्या

निरोगी राहण्यासाठी स्वतःला सक्रिय ठेवणे आवश्यक आहे, परंतु जेव्हा लोक शारीरिकदृष्ट्या निष्क्रिय होतात, तेव्हा त्याचा परिणाम आपल्या सर्व अवयवांवर होऊ लागतो. सक्रिय नसल्यामुळे शरीरात विषारी पदार्थ तयार होऊ लागतात आणि ते काढून टाकण्याची तुमच्या किडनीची क्षमताही कमी होते आणि या सवयीचा तुमच्या किडनीवर परिणाम होऊ लागतो.

2-इतर रोगांमुळे मूत्रपिंडाचा त्रास

कोणत्याही व्यक्तीला त्यांचा रक्तदाब तसेच रक्तातील साखर राखणे आवश्यक आहे, कारण या दोन्ही परिस्थिती किडनीचे आरोग्य बिघडवण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे. अनेकदा मधुमेही रुग्णांना किडनीचे आजार होण्याची शक्यता असते, त्यामुळे तुम्हाला तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याची गरज आहे.

3-खाण्याच्या सवयींमुळे किडनीचा त्रास होतो

तुम्हाला तुमच्या आहारात हेल्दी डाएट समाविष्ट करणे आवश्यक आहे, जे तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करते. सकस आहार आपले, आरोग्य राखण्याचे काम करतो. याशिवाय, तुम्हाला तुमच्या पाण्याचे सेवन म्हणजेच पाण्याचे प्रमाण याचीही काळजी घ्यावी लागेल. खूप कमी किंवा जास्त पाणी शरीरातील द्रव फिल्टर करण्यासाठी मूत्रपिंडांना अडथळा आणते. त्यामुळे खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या.