24 वर्षांपूर्वी सलमानला चित्रपटात मिळाली होती ऐश्वर्याच्या भावाची भूमिका! शाहरुख ऐवजी दिसला असता भाईजान

Aishwarya Rai Salman Khan : तर शाहरुख खानच्या जागी ऐश्वर्याच्या भावाच्या भूमिकेत दिसला असता सलमान खान...

दिक्षा पाटील | Updated: Aug 19, 2024, 11:15 AM IST
24 वर्षांपूर्वी सलमानला चित्रपटात मिळाली होती ऐश्वर्याच्या भावाची भूमिका! शाहरुख ऐवजी दिसला असता भाईजान  title=
(Photo Credit : Social Media)

Aishwarya Rai Salman Khan : बॉलिवूडमधील सलमान खान आणि ऐश्वर्या रायच्या जोडीनं फक्त मोठ्या पडद्यावर नाही तर खऱ्या आयुष्यात देखील सगळ्यांची मने जिंकली. दोघांनी एकत्र 'हम दिल दे चुके सनम' आणि 'हम तुम्हारे हैं सनम' सारखे चित्रपट केले. 'हम दिल दे चुके सनम' दरम्यान, त्यांच्यातील जवळीकता वाढली आणि मग त्यानंतर त्यांच्या अफेयरच्या खूप चर्चा रंगल्या होत्या. पण तुम्हाला माहितीये का की एका चित्रपटासाठी सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांना भाऊ-बहीण म्हणून कास्ट करण्यात येणार होते. चला तर तो कोणता चित्रपट होता जाणून घेऊया...

2000 मध्ये प्रदर्शित झालेला 'जोश' हा चित्रपट तुम्ही नक्कीच पाहिला असेल. या चित्रपटात ऐश्वर्या राय, शाहरुख खान आणि चंद्रचूर्ण सिंग सारख्या कलाकारांनी महत्त्वाची भूमिका साकरली होती. या चित्रपटात शाहरुख आणि ऐश्वर्यानं भाऊ-बहिणीची भूमिका साकारली होती. याविषयी बोलताना ऐश्वर्यानं एकदा 'बॉलिवूड हंगामा'ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की 'कधी सलमान खान आणि आमिर खानला जोशसाठी कास्ट करण्यात आलं होतं. या चित्रपटात चंद्रचूर्णच्या भूमिकेसाठी आमिर होता आणि शाहरुख खानच्या भूमिकेसाठी सलमानला कास्ट करण्यात आलं होतं. पण त्यानंतर ती भूमिका शाहरुखला देण्यात आली होती. मला त्याच्या बहिणीची भूमिका करण्यात काहीही तक्रार नव्हती. कारण मला वाटलं हे काही नवीन असेल, हे वेगळं असेल. त्यांना या भूमिकेत काही खास दिसलं आणि त्यानं या भूमिकेसाठी होकार दिला.'

हेही वाचा : 'कल्किमध्ये जोकर दिसत होता प्रभास', अमिताभ यांची स्तुती करत अरशद वारसी म्हणाला...

दरम्यान, सलमान खान आणि ऐश्वर्या राय हे 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटा दरम्यान, रिलेशनशिपमध्ये आले होते. सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचं नातं जास्त काळ टिकलं नाही आणि ते विभक्त झाले. दोघांमध्ये असलेलं नातं खूप वाईट पद्धतीनं तुटलं. त्यावेळी सोशल मीडियावर अशी माहिती समोर आली की ऐश्वर्या रायनं सलमान खानवर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ऐश्वर्यानं अभिषेक बच्चनसोबत लग्न केलं. मात्र, आता ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये वाद सुरु असल्याचे म्हटले जात होते. त्यावर अभिषेकनं त्याच्या लग्नाची अंगठी दाखवत या सगळ्या अफवांवर पूर्ण विराम लावला आहे.