Bollywood च्या दंबगने रागाच्या भरात 'या' बड्या Celebrities च्या कानाखाली लगावली, कोण आहेत 'हे' कलाकार?

नेमकं 'या' कलाकारांनी असं केलं तरी काय की बॉलिवूडच्या दंबगचा राग  झाला अनावर, उचललं 'हे' पाऊल  

Updated: Nov 29, 2022, 08:39 PM IST
Bollywood च्या दंबगने रागाच्या भरात 'या' बड्या Celebrities च्या कानाखाली लगावली, कोण आहेत 'हे' कलाकार? title=
The arrogance of Bollywood superstar salman khan angrily put these under the ears of big celebrities who are these Celebrities nz

Bollywood Celebrities : बॉलिवूडमधील (Bollywood) दंबग म्हणजेच सलमान खान (Salman Khan) हा अनेक कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याच्यासोबत पंगा घेणे अनेक बड्या कलाकारांना महागात पडलं आहे. कधी कधी हा बॉलीवूड अभिनेता द्याळू असतो तर कधी कधी रागीट अवतार देखील पाहायला मिळतो. सलमान खानने बॉलिवूडमध्ये अनेक स्टार्स लाँच (Stars lunch) करून त्याचं करिअर घडवण्यात मोलाच सहभाग नोंदवला आहे. पण जर सलमानला कोणावर राग आला की त्याचे करिअर बरबाद होते. सलमान खान चुकीच्या गोष्टी अजिबात सहन करत नाही. यामुळे त्यांना प्रचंड राग येतो. अशा परिस्थितीत आजच्या लेखात आम्ही तुम्हाला त्या सेलिब्रिटींबद्दल (Celebrities) सांगणार आहोत ज्यांना सलमान खानने रागाच्या भरात थप्पडही मारली होती. (The arrogance of Bollywood superstar salman khan angrily put these under the ears of big celebrities who are these Celebrities nz)

 

ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan)

ऐश्वर्या राय आणि सलमान खानची लव्हस्टोरी कोणापासून लपलेली नाही. एकेकाळी जोडपी एकमेकांवर खूप प्रेम करायची. त्याच्या ब्रेकअपबद्दल बोलत असतानाच त्यांच्या ब्रेकअपची कहाणीही कोणापासून लपलेली नाही. त्यांच्या नात्यात एक वेळ अशी आली होती जेव्हा दोघांना एकमेकांचा चेहरा देखील पाहायचा नव्हता. या जोडप्याच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्या रायने आरोप केला होता की, सलमान तिला खूप मारायचा.

 

कतरिना कैफ (Katrina Kaif)

कतरिना कैफला सलमान खानने बॉलिवूडमध्ये लॉन्च केले होते. या दोघांची जोडीही प्रेक्षकांना खूप आवडली होती. दोघेही बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात होते. बरं दोघांचं नंतर ब्रेकअप झालं. 2008 मध्ये दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर सलमान खानने कतरिना कैफला थप्पड मारल्याची बातमी आली होती. 

 

रणबीर कपूर (Ranbir Kapoor)

एकेकाळी सलमान कतरिनावर खूप प्रेम करायचा. रणबीर कपूर आल्यानंतरच कतरिना आणि सलमानचे ब्रेकअप झाल्याचेही बोलले जात होते. एकदा रणबीर कपूर आणि सलमान खान यांच्यात प्रचंड मतभेद झाले होते. यानंतर सलमान खानला आपला राग आवरता आला नाही आणि त्याने रणबीर कपूरला थप्पड मारली. तेव्हापासून कपूर कुटुंबाला सलमान खान फारसे महत्त्व देत नाही.

अनुराग कश्यप (Anurag Kashyap)

तेरे नाम हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटातून सलमानलाही खूप प्रसिद्धी मिळाली. अनुराग कश्यपनेच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. अनुराग कश्यपने सलमान खानला छातीचे केस काढण्यास सांगितले होते. यानंतर सलमान खान चांगलाच संतापला. यानंतर सलमानने निर्मात्याशी बोलून अनुराग कश्यपला या चित्रपटातून काढून टाकले.

शाहरुख खान (Shah Rukh Khan)

शाहरुख खान आणि सलमान खान आजही खास मित्र आहेत. एक काळ असा होता की दोघांमध्ये खूप तणाव होता. यानंतर सलमान एकदा चिडला आणि त्याने शाहरुखला थप्पड मारली. त्यानंतर काही वर्षांनी सलमानने शाहरुखची माफी मागून मैत्रीचा हात पुढे केला.